वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की, धंगेकर यांच्या पत्नीवर अटकेचे संकट होते, त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला.

वक्फच्या जागेचा वाद – धंगेकरांचे उत्तर

धंगेकर यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “वक्फ बोर्डाची जागा आम्ही घेतली, ती कोर्टाने लिलावात दिली होती. हा विषय १९६६ पासूनचा आहे, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. तरीही आम्हाला राजकीय बळी ठरवले जात आहे.”

त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले, “ही जागा घेतली म्हणून मुस्लिम समाजाला दु:ख वाटायला हवं, पण दु:ख होतंय भाजपला!” तसेच, “वरिष्ठ स्तरावरून दबाव आणला गेला, पण मी डगमगलो नाही. ही मालमत्ता मी कर्ज काढून घेतली होती आणि तिचे रेरा रजिस्ट्रेशनही आहे.”

भाजपकडून त्रास? – धंगेकरांचे स्पष्टीकरण

भाजपने आपल्याला त्रास दिला का, या प्रश्नावर “तुम्ही माहिती घ्या” असे त्यांनी उत्तर दिले. तसेच, “या प्रकरणामुळे मी पक्ष बदलला नाही. कार्यकर्ते आणि कुटुंबीयांशी चर्चा करूनच निर्णय घेतला.”

काँग्रेस सोडताना “मला दुःख होत आहे, काँग्रेसने मला खूप काही दिले”, असे सांगत त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले. “आमची काही चूक असेल, तर आम्हाला तुरुंगात टाका. आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही.”

पक्ष बदलाचा निर्णय कशामुळे?

धंगेकर यांना भाजपने “फोडले” असा आरोप केला जात असताना त्यांनी स्पष्ट केले की, “कार्यकर्त्यांच्या मतानुसार निर्णय घेतला आहे. काँग्रेसने दोनदा उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

लोकसभेपासून आपली कोंडी केली जात होती असा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला, मात्र आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Posts

झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

Leave a Reply

You Missed

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!