
भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड मान्य नाही. 7 मेच्या मध्यरात्री भारताच्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जबरदस्त हवाई हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीला कारण ठरला, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला अमानवी हल्ला — जिथे एका सामान्य काश्मीरी नागरिकाची महिलांसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती.
‘ऑपरेशन सिंदूर’ची योजना आणि अंमलबजावणी
भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काटेकोर आणि गुप्त नियोजन केलं. 7 मेच्या रात्री सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये एकाच वेळी 9 ठिकाणी एअर स्ट्राईक्स करण्यात आल्या. या टार्गेट्समध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रांचा समावेश होता. विशिष्ट माहितीनुसार, जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या कुटुंबीयांवरही या कारवाईत प्रभाव पडल्याचं समजतं.
पाकिस्तानचा अंतर्गत गोंधळ आणि नागरिकांची कबुली
या ऑपरेशननंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कर गोंधळलेले दिसले. अधिकृत नकारात्मक प्रतिक्रिया येण्याऐवजी सोशल मीडियावर फेक न्यूजचा पूर आला. पाकिस्तानचे फायटर जेट्स पाडल्याच्या, भारतीय सैन्य मुख्यालयांवर हल्ले झाल्याच्या बातम्या पसरवून जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, याला पूर्ण विराम दिला एका पाकिस्तानी नागरिकाच्या व्हिडिओने.
पाकिस्तान को बेनक़ाब करते पाकिस्तानी नागरिक, चीनी डिफेंस सिस्टम का भी सच सुना रहे हैं पाकिस्तानी pic.twitter.com/6MLKR9OHCt
— Vishal Pandey (@vishalpandeyk) May 8, 2025
या नागरिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं की, “भारताने 24 क्षेपणास्त्र पाकिस्तानात डागली आणि सर्वांनी अचूक टार्गेट हिट केलं. आपल्या डिफेन्स सिस्टिमला एकही मिसाईल रोखता आली नाही. भारताचं म्हणणं होतं ‘घुसून मारू’, आणि खरंच त्यांनी घुसून मारलं.”
तो पुढे म्हणतो, “हे भारताचं कौतुक नाही, हे वास्तव आहे. आपण फक्त ऐकत होतो की इराण 400 मिसाईल फायर करतो, इस्रायलची सिस्टिम त्यातली 90% अडवते. पण भारताने 24 मिसाईल डागली आणि आपण एकाहीला अडवू शकलो नाही. नशीब अजून त्यांनी सैन्य तळांना लक्ष्य केलं नाही!”
पाकिस्तानमधील फेक न्यूजचा पर्दाफाश
हा नागरिक सांगतो की, “मीडिया आणि सोशल मीडियावर रात्रीपासून अफवा सुरू होत्या. फायटर जेट्स पाडली गेली, मुख्यालयावर हल्ले झाले, पण हे सर्व खोटं आहे. वापरलेले फोटोही जुने आहेत – काही आठ महिने, काही तीन वर्षांपूर्वीचे. हे सगळं फेक न्यूज आहे.”
भारताचा स्पष्ट संदेश
‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे — देशाच्या नागरिकांवर हल्ला झाला, तर त्याचं उत्तर आक्रमक आणि परिणामकारक असेल. ही केवळ हवाई कारवाई नव्हे, तर एक रणनीतिक इशारा होता, की भारत आता केवळ सहन करणारा देश राहिलेला नाही.