दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेलगत केलेल्या एअर स्ट्राइकनंतर राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईवर सविस्तर प्रतिक्रिया देत तीव्र मत मांडले आहे. त्यांनी हल्ल्याचा निषेध करताना दहशतवादाविरोधात ठोस आणि लक्ष्य केंद्रीत कारवाईची मागणी केली, पण युद्धजन्य वातावरण तयार करण्यास विरोध केला.

पहलगाम हल्ल्यावर तीव्र शब्दांत निषेध

“पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला, त्याचा मी सर्वात आधी निषेध केला होता. असे हल्ले नक्कीच असह्य आहेत. मात्र यावर उत्तर म्हणून युद्ध हाच पर्याय असू शकत नाही,” असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

अतिरेक्यांना थेट लक्ष्य करून कारवाई हवी

ते म्हणाले, “दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जी शिक्षा पुढच्या पिढ्यांनाही आठवणीत राहील. पण अशा घटनांमागे मूळ कारण शोधणं आणि नेमके उपाय शोधणं हे अधिक महत्त्वाचं आहे. अमेरिकेवर 9/11 स्फोट झाले तेव्हा त्यांनी थेट अतिरेक्यांवर लक्ष्य साधलं, पण युद्ध पुकारलं नाही. आपल्यालाही तोच धडा घ्यायला हवा.”

“मॉकड्रील नव्हे, कोम्बिंग ऑपरेशन करा”

राज ठाकरे यांनी मॉकड्रीलसारख्या घोषणात्मक कृतींवर टीका करत सुरक्षेच्या वास्तविक उपायांवर भर देण्याची गरज सांगितली. “हजारो पर्यटक ज्या ठिकाणी जातात, तिथे सुरक्षेची काय व्यवस्था होती? मॉकड्रीलच्या नुसत्या सायरननं काही साध्य होणार नाही. त्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करून जे अतिरेकी अजून सापडले नाहीत, त्यांना शोधून काढा,” असा सल्ला त्यांनी दिला.

पंतप्रधानांच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह

या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीवरही सवाल उपस्थित केला. “घटना घडली तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियात होते, त्यानंतर ते बिहारमध्ये प्रचारासाठी गेले, केरळमध्ये अदानींच्या पोर्टच्या उद्घाटनासाठी गेले आणि मुंबईत वेव्ह समीटमध्ये सहभागी झाले. जर परिस्थिती इतकी गंभीर होती, तर ही दौरे थांबवता आले असते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

देशात अंतर्गत सुरक्षेवर भर द्या

देशात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अपुऱ्या आहेत, यावरही राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. “आज नाक्या-नाक्यावर सहज ड्रग्स मिळतोय. हा दहशतवादाच्या खतपाणी घालणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

शांतता, संयम आणि धोरणात्मक कृतिशीलता हवी

राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे – दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई व्हावी, पण युद्धजन्य आणि भावनात्मक वातावरण तयार करून लोकांचं लक्ष भरकटवणं योग्य नाही. “शांतपणे, धोरणात्मक निर्णय घेऊन अतिरेक्यांवर कारवाई करा. युद्धाने सामान्य माणसाचंच नुकसान होतं,” असं त्यांनी शेवटी सांगितलं.

 

  • Related Posts

    “तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरून भारतावर हवाई आणि तोफगोळ्यांद्वारे हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताने या हल्ल्याला केवळ यशस्वीरित्या…

    पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

    आयपीएल 2025 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 8 मे रोजी धर्मशाळेच्या मैदानावर पार पडत होता. नियोजित वेळेनुसार खेळाला सुरुवात झाली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा…

    Leave a Reply

    You Missed

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे