“‘छावा’ हा वाईट सिनेमा, हा कोणता इतिहास?'”– आस्ताद काळेच्या थेट वक्तव्यानं सोशल मिडीयावर खळबळ !

नावाजलेला अभिनेता आस्ताद काळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी ‘छावा’ सिनेमाविषयी केलेल्या थेट विधानामुळे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप सोडली. मात्र, सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच तो अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडला होता. आता वाद शमल्यावर, या सिनेमावर आस्ताद काळेने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

आस्तादने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले, “’छावा’ हा एक वाईट सिनेमा आहे. सिनेमा म्हणूनच नव्हे तर इतिहासाच्या दृष्टीनेही तो त्रासदायक आहे. सर्व बाजूंनी तो अपयशी आहे,” असं त्याने ठामपणे नमूद केलं.

त्याच्या पोस्टमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत – “महाराणी सोयराबाई यांनी औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं, याचे काय ऐतिहासिक पुरावे आहेत? त्या काळातील राजकीय घडामोडी पाहता, अशा घटना घडल्या होत्या का? औरंगजेब वयस्क आणि आजारी असताना तो इतक्या वेगाने कारवाई करू शकतो का?”

इतकंच नाही, तर आस्तादने सिनेमात दाखवलेल्या काही दृश्यांवरही प्रश्न उपस्थित केले. “सोयराबाई राणी सरकार परपुरुषासमोर पान लावत आहेत आणि ते खात आहेत – हे कुठल्या ऐतिहासिक आधारावर?” अशा स्वरूपाचे प्रश्न त्याने उपस्थित केले.

विशेष बाब म्हणजे, आस्ताद काळे याने ‘छावा’ सिनेमात सूर्या ही भूमिका साकारली होती. सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावूनही, त्याने उघडपणे टीका केल्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

एका नेटकऱ्याने विचारले, “सिनेमात काम करून आता अचानक एवढे प्रश्न का आठवले?” तर दुसऱ्याने म्हटलं, “राजकीय मंडळींनी आधीच आक्षेप घेतला होता, पण तू त्यावेळी गप्प का होतास?”

सध्या आस्ताद काळेच्या या पोस्टवर जोरदार चर्चा रंगली असून, सिनेमाच्या ऐतिहासिक अचूकतेबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

  • Related Posts

    चक्क 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट; सोशल मीडियावर व्हिडीओची भरपूर चर्चा !

    सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला सध्या पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात…

    शाहरुख खानचे ‘मन्नत’ नव्या रुपात! नुतनीकरणासाठी कुटुंब काही काळ भाड्याच्या घरात!

    ‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!