चक्क 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट; सोशल मीडियावर व्हिडीओची भरपूर चर्चा !

सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला सध्या पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मनोरंजन चित्रपटसृष्टीमधील काही दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर, आशा भोसले, सोनाली बेंद्रे, शर्वरी वाघ आणि इतर काही मंडळींचा समावेश आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची खूप जुनी मैत्री आहे. जवळपास ३० वर्षानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची पुन्हा भेट झाल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचे १९९६ साली आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता जवळपास ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चांगली पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच इतक्या वर्षानंतरही सोनाली आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आजही चांगली मैत्रीचे असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

  • Related Posts

    पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मौन; 8 दिवसांपासून फक्त ‘हे’च करतायत…

    22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी…

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा भावनिक निर्णय…!

    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार