“‘छावा’ हा वाईट सिनेमा, हा कोणता इतिहास?'”– आस्ताद काळेच्या थेट वक्तव्यानं सोशल मिडीयावर खळबळ !

नावाजलेला अभिनेता आस्ताद काळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी ‘छावा’ सिनेमाविषयी केलेल्या थेट विधानामुळे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप सोडली. मात्र, सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच तो अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडला होता. आता वाद शमल्यावर, या सिनेमावर आस्ताद काळेने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

आस्तादने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले, “’छावा’ हा एक वाईट सिनेमा आहे. सिनेमा म्हणूनच नव्हे तर इतिहासाच्या दृष्टीनेही तो त्रासदायक आहे. सर्व बाजूंनी तो अपयशी आहे,” असं त्याने ठामपणे नमूद केलं.

त्याच्या पोस्टमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत – “महाराणी सोयराबाई यांनी औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं, याचे काय ऐतिहासिक पुरावे आहेत? त्या काळातील राजकीय घडामोडी पाहता, अशा घटना घडल्या होत्या का? औरंगजेब वयस्क आणि आजारी असताना तो इतक्या वेगाने कारवाई करू शकतो का?”

इतकंच नाही, तर आस्तादने सिनेमात दाखवलेल्या काही दृश्यांवरही प्रश्न उपस्थित केले. “सोयराबाई राणी सरकार परपुरुषासमोर पान लावत आहेत आणि ते खात आहेत – हे कुठल्या ऐतिहासिक आधारावर?” अशा स्वरूपाचे प्रश्न त्याने उपस्थित केले.

विशेष बाब म्हणजे, आस्ताद काळे याने ‘छावा’ सिनेमात सूर्या ही भूमिका साकारली होती. सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावूनही, त्याने उघडपणे टीका केल्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

एका नेटकऱ्याने विचारले, “सिनेमात काम करून आता अचानक एवढे प्रश्न का आठवले?” तर दुसऱ्याने म्हटलं, “राजकीय मंडळींनी आधीच आक्षेप घेतला होता, पण तू त्यावेळी गप्प का होतास?”

सध्या आस्ताद काळेच्या या पोस्टवर जोरदार चर्चा रंगली असून, सिनेमाच्या ऐतिहासिक अचूकतेबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

  • Related Posts

    चक्क 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट; सोशल मीडियावर व्हिडीओची भरपूर चर्चा !

    सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला सध्या पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात…

    शाहरुख खानचे ‘मन्नत’ नव्या रुपात! नुतनीकरणासाठी कुटुंब काही काळ भाड्याच्या घरात!

    ‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला…

    Leave a Reply

    You Missed

    १७ महिन्यांचा एकाग्र झाला कोट्यधीश; नारायण मूर्ती यांच्या नातवाची १० कोटींपेक्षा अधिक कमाई !

    १७ महिन्यांचा एकाग्र झाला कोट्यधीश; नारायण मूर्ती यांच्या नातवाची १० कोटींपेक्षा अधिक कमाई !

    फ्लोरिडा विद्यापीठात गोळीबाराची घटना: दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी

    फ्लोरिडा विद्यापीठात गोळीबाराची घटना: दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी

    “बाळासाहेब असते, तर हे वागणं सहन केलं नसतं!”, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

    “बाळासाहेब असते, तर हे वागणं सहन केलं नसतं!”, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

    महिला वकिलावर अमानुष हल्ला: सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल!

    महिला वकिलावर अमानुष हल्ला: सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल!

    “देवदूत की मृत्यूदूत?” – जर्मनीतील डॉक्टरने मौजमजेसाठी केली 15 रुग्णांची हत्या!

    “देवदूत की मृत्यूदूत?” – जर्मनीतील डॉक्टरने मौजमजेसाठी केली 15 रुग्णांची हत्या!

    राज्यात हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा !

    राज्यात हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा !

    “पत्नीला मूल होत नाही म्हणून तहसीलदाराची राक्षसी वागणूक – धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा”

    “पत्नीला मूल होत नाही म्हणून तहसीलदाराची राक्षसी वागणूक – धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा”

    महागाईत मोठी घसरण; सर्वसामान्यांना मोठा दिलासा !

    महागाईत मोठी घसरण; सर्वसामान्यांना मोठा दिलासा !

    शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘लाडका शेतकरी योजनेंतर्गत’ प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजारांची मदत जाहीर !

    शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘लाडका शेतकरी योजनेंतर्गत’ प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजारांची मदत जाहीर !