भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले अनिल परब…?

मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा येणे अनिवार्य नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मांडली. या वक्तव्यावर विधानपरिषदेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. आमदार अनिल परब यांनी संघावर टीका करताना म्हटले की, “मुंबईचे तुकडे पाडण्याचा आणि तिला गुजरातमध्ये सामील करण्याचा कट रचला जात आहे.” त्यांनी सरकारकडून भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याची मागणी केली.

अनिल परब यांनी मुंबईतील उद्योग गुजरातला नेल्याचा आरोप करत, “मुंबईचे गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी भाषिकांना डावलून मतांसाठी हे होत आहे,” असे विधान केले. तसेच, “मुंबईत येणाऱ्यांनी किमान मराठी शिकण्याचा प्रयत्न करावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला, ज्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला आणि १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

भैय्याजी जोशी काय म्हणाले ?

विद्याविहारमधील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी म्हणाले की, “मुंबईची एक विशिष्ट भाषा नाही, येथे विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरमध्ये गुजराती भाषा प्रमुख आहे, तर गिरगावात मराठी अधिक प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईत आलेल्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही.” त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

या विषयावर विधानसभेतही चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “मुंबई आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठीच आहे. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो, परंतु मराठीला डावलणे योग्य नाही.” त्यांनी भाषिक सहिष्णुतेचा संदेश दिला आणि सर्व भाषांचा सन्मान राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

 

Related Posts

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती