राज ठाकरेंचा भय्याजी जोशींवर हल्लाबोल: “या असल्या काड्या घालून…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी “मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही” असे विधान केले. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली असून, भारतीय जनता पक्षाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून भय्याजी जोशींवर हल्लाबोल केला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांतरचना आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचा उल्लेख करत, “भय्याजींनी हे विधान बंगळुरू किंवा चेन्नईत जाऊन करून दाखवावे,” असे म्हटले. तसेच, “भय्याजी जोशी यांच्या विधानाशी महाराष्ट्रातील भाजपा सहमत आहे का?” असा थेट सवालही त्यांनी केला.

“मराठी जनता दुधखुळी नाही!”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मुंबई आणि एमएमआर परिसरातील विकासाच्या आड काही राजकीय हेतू लपलेले आहेत. हे काय चाललंय हे जनता समजून आहे. स्वतः मराठी असूनही जोशींनी हे विधान करणे दुर्दैवी आहे.”

तसेच, “ब्रिटिश गायक ख्रिस मार्टिनसुद्धा मुंबईत येऊन मराठीत बोलतो, मग जोशींना मुंबईची भाषा समजत नाही का? हे राजकीय हेतूशिवाय होत नाही,” असा आरोपही त्यांनी केला. “या असल्या काड्या घालून नवा संघर्ष निर्माण करू नका!” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

“गुढीपाडव्याला सविस्तर बोलेन!”

या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अधिक सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. “मनसे या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे विसरणार नाही!” असे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी नमूद केले.

भय्याजी जोशींचे नेमके वक्तव्य काय?

विद्याविहारमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, “मुंबईला एक ठराविक भाषा नाही. येथे अनेक भाषा बोलल्या जातात. घाटकोपरमध्ये गुजराती, गिरगावात मराठी, तर इतर ठिकाणी हिंदी बोलणारे लोक दिसतात. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही.”

भय्याजी जोशी यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपा यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती