भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले अनिल परब…?

मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा येणे अनिवार्य नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मांडली. या वक्तव्यावर विधानपरिषदेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. आमदार अनिल परब यांनी संघावर टीका करताना म्हटले की, “मुंबईचे तुकडे पाडण्याचा आणि तिला गुजरातमध्ये सामील करण्याचा कट रचला जात आहे.” त्यांनी सरकारकडून भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याची मागणी केली.

अनिल परब यांनी मुंबईतील उद्योग गुजरातला नेल्याचा आरोप करत, “मुंबईचे गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी भाषिकांना डावलून मतांसाठी हे होत आहे,” असे विधान केले. तसेच, “मुंबईत येणाऱ्यांनी किमान मराठी शिकण्याचा प्रयत्न करावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला, ज्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला आणि १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

भैय्याजी जोशी काय म्हणाले ?

विद्याविहारमधील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी म्हणाले की, “मुंबईची एक विशिष्ट भाषा नाही, येथे विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरमध्ये गुजराती भाषा प्रमुख आहे, तर गिरगावात मराठी अधिक प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईत आलेल्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही.” त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

या विषयावर विधानसभेतही चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “मुंबई आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठीच आहे. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो, परंतु मराठीला डावलणे योग्य नाही.” त्यांनी भाषिक सहिष्णुतेचा संदेश दिला आणि सर्व भाषांचा सन्मान राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

 

Related Posts

झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

Leave a Reply

You Missed

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!