भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले अनिल परब…?

मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा येणे अनिवार्य नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मांडली. या वक्तव्यावर विधानपरिषदेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. आमदार अनिल परब यांनी संघावर टीका करताना म्हटले की, “मुंबईचे तुकडे पाडण्याचा आणि तिला गुजरातमध्ये सामील करण्याचा कट रचला जात आहे.” त्यांनी सरकारकडून भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याची मागणी केली.

अनिल परब यांनी मुंबईतील उद्योग गुजरातला नेल्याचा आरोप करत, “मुंबईचे गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी भाषिकांना डावलून मतांसाठी हे होत आहे,” असे विधान केले. तसेच, “मुंबईत येणाऱ्यांनी किमान मराठी शिकण्याचा प्रयत्न करावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला, ज्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला आणि १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

भैय्याजी जोशी काय म्हणाले ?

विद्याविहारमधील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी म्हणाले की, “मुंबईची एक विशिष्ट भाषा नाही, येथे विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरमध्ये गुजराती भाषा प्रमुख आहे, तर गिरगावात मराठी अधिक प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईत आलेल्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही.” त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

या विषयावर विधानसभेतही चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “मुंबई आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठीच आहे. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो, परंतु मराठीला डावलणे योग्य नाही.” त्यांनी भाषिक सहिष्णुतेचा संदेश दिला आणि सर्व भाषांचा सन्मान राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

 

Related Posts

वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आरोप…

“मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य, कृषी आणि समाजकल्याण क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.…

Leave a Reply

You Missed

“जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

“जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

“महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

“महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

“मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

“मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

धंगेकरांचा राजकीय पलटवार! काँग्रेसला सोडचिठ्ठी, शिंदेगटात नव्या इनिंगची तयारी…

धंगेकरांचा राजकीय पलटवार! काँग्रेसला सोडचिठ्ठी, शिंदेगटात नव्या इनिंगची तयारी…

भारतीय वंशाच्या बालेश धनखडला ऑस्ट्रेलियात ४० वर्षांची शिक्षा – बलात्कारासह ३९ गुन्ह्यांत दोषी..!

भारतीय वंशाच्या बालेश धनखडला ऑस्ट्रेलियात ४० वर्षांची शिक्षा – बलात्कारासह ३९ गुन्ह्यांत दोषी..!