केंद्रीय मंत्र्याचं कुटुंब सुखरूप नसेल तर सामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? – शरद पवार गटाचा सरकारला सवाल

मुंबई | महाराष्ट्रातील नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (३ मार्च) पासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होणार असून, आगामी काही दिवसांत विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पुण्यातील बलात्कार प्रकरण आणि जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाडीच्या घटनेमुळे सरकार अडचणीत आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी या घटनांवरून सरकारवर टीका करत, “जेव्हा केंद्रीय मंत्र्यांचं कुटुंबच सुरक्षित नाही, तेव्हा सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार?” असा सवाल केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांवरही राजीनाम्याची वेळ आली आहे. जलसंधारण मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बीड हत्याकांड प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

यासोबतच, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील वाढते गुन्हे, मंत्र्यांवरील आरोप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. विरोधकांच्या हल्लाबोलास सरकार कसा सामना देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर यासाठी आम्ही घेऊन येत आहोत अधिवेशन स्पेशल रेपोर्ट फक्त आमच्या खास वाचकासाठी ….

  • Related Posts

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने अखेर एक पाऊल मागे टाकत तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, मनसेने याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै…

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गती आणण्यासाठी ₹57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात विशेषतः मेट्रो प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून, नागरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दिसते. मुख्यमंत्री…

    Leave a Reply

    You Missed

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू