बेरोजगारी आणि युवा वर्ग: बदलत्या अर्थव्यवस्थेतील आव्हाने

भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग हा युवा वर्गाचा आहे. ही ऊर्जा, ही सर्जनशीलता जर योग्य दिशेने वळवली तर देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलू शकते. मात्र, सध्याच्या बदलत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर युवकांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे – “बेरोजगारी”

यात बेरोजगारीचे कारणे पहिली तर अनेकदा युवक उच्च शिक्षण घेतात, परंतु ते शिक्षण उद्योगधंद्यांना अपेक्षित कौशल्ये देत नाही. परिणामी, ‘डिग्रीधारक’ असूनही अनेक युवक बेरोजगार राहतात. त्याचबरोबर पारंपरिक सरकारी नोकऱ्या अजूनही अनेक तरुणांची पहिली पसंती आहेत. पण या नोकऱ्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे स्पर्धा तीव्र होते आणि बहुतेकजण नोकरीपासून वंचित राहतात. तसेच कोविड-१९ नंतर अनेक उद्योगांनी संधी कमी केल्या, काही कंपन्या बंद पडल्या किंवा कर्मचारी कपात केली. या बदलांनी युवकांसाठी असलेले रोजगार आणखीनच कमी केले.

यावर पर्यायी रोजगार संधी पहिल्या तर युवकांनी पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा स्टार्टअप्सकडे वळल्यास ते स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात. आज भारतातील अनेक यशस्वी स्टार्टअप्स युवकांनीच सुरू केले आहेत. तसेच इंटरनेटच्या प्रसारामुळे आता कोणताही युवक घरबसल्या वेब डिझाइन, कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, व्हिडिओ एडिटिंग यासारख्या सेवांद्वारे उत्पन्न मिळवू शकतो. त्याचबरोबर सरकारच्या ‘स्किल इंडिया’ सारख्या योजना, तसेच खासगी प्रशिक्षण संस्था युवकांना नवे कौशल्य शिकवतात. डिजिटल मार्केटिंग, कोडिंग, ग्राफिक डिझाइन, टैली, शेफिंग इत्यादी कोर्सेसमुळे रोजगाराच्या संधी वाढतात.

यासाठी युवकांनी पारंपरिक विचारसरणीऐवजी नव्या संधी शोधाव्यात. तसेच स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यास घाबरू नये, स्पर्धा परीक्षा देता देता अन्य कौशल्ये शिकावीत, स्वयंरोजगार किंवा उद्यमशीलतेकडे वळावे, डिजिटल क्षेत्रातील संधी ओळखाव्यात.

बेरोजगारी ही एक मोठी समस्या असली, तरी त्यावर उपायही आहेत — गरज आहे ती आपल्या मानसिकतेत बदल करण्याची. युवकांनी पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा नव्या दिशा स्वीकाराव्यात. उद्योजकता, स्टार्टअप्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स या सगळ्या गोष्टी युवकांसाठी नवे दरवाजे उघडत आहेत. योग्य मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाच्या मदतीने ही ‘बेरोजगार’ शक्ती ‘बदल घडवणारी शक्ती’ बनू शकते.

  • Related Posts

    आधार कार्डशी संबंधित मोठा अपडेट: जुना मोबाइल नंबर असल्यास OTP मिळणार नाही! UIDAI कडून नवा नियम लागू

    नवी दिल्ली | ३ मे २०२५ UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने आधार वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर आधार कार्डाशी जोडलेला तुमचा मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून बंद असेल,…

    जर तुम्ही रोजच्या व्यवहारासाठी UPI अ‍ॅप्स – Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल, तर हे नक्की वाचा…

    १ एप्रिल २०२५ पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे…

    Leave a Reply

    You Missed

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही