
१ एप्रिल २०२५ पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे आहे.
UPI वापरकर्त्यांसाठी नवीन नियम काय आहेत?
१. ९० दिवस वापरात नसलेला नंबर निष्क्रिय होणार
जर तुमचा बँकेत नोंदलेला मोबाइल नंबर ९० दिवसांहून अधिक काळ बंद असेल, तर त्या नंबरवरची UPI सेवा आपोआप बंद होणार आहे. कारण असे नंबर टेलिकॉम कंपन्या ‘रीसायकल’ करून नवीन ग्राहकांना देतात, आणि यामुळे फसवणुकीचा धोका निर्माण होतो.
२. बँकांनी आठवड्याला नंबर स्टेटस तपासावा
NPCI ने बँकांना आदेश दिले आहेत की त्यांनी दर आठवड्याला ग्राहकांच्या मोबाइल नंबरची स्थिती (active/inactive) तपासावी. यामुळे बंद नंबरशी संबंधित UPI ID आपोआप निष्क्रिय करता येतील.
३. जुना नंबर नवीन व्यक्तीकडे गेला तर जुनी UPI ID निष्क्रिय
जर तुमचा जुना नंबर कोण्या दुसऱ्याच्या नावावर गेला, तर त्या नंबरशी जुडलेली UPI ID वापरता येणार नाही. ही पद्धत ग्राहकांच्या खात्याची गोपनीयता राखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
४. न्यूमेरिक UPI ID साठी ग्राहकांची स्पष्ट परवानगी आवश्यक
UPI अॅप्सना आता ग्राहकांकडून न्यूमेरिक (उदा. मोबाईल नंबरसारखी) UPI ID वापरण्यासाठी स्पष्ट परवानगी घ्यावी लागेल. ही सुविधा ऑप्ट-इन स्वरूपात असेल, म्हणजे ती वापरायची असल्यास ग्राहकाने ती स्वतः सुरू करावी लागेल.
हे नियम का महत्त्वाचे आहेत?
UPI हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि वेगाने वाढणारे डिजिटल पेमेंट माध्यम बनले आहे. २०२४ मध्ये तब्बल १७२.२ अब्ज व्यवहार UPI वर झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने NPCI हे बदल करत आहे, जेणेकरून फसवणूक, चुकीचे व्यवहार व डेटा लिकेज यांसारख्या समस्यांना आळा बसू शकेल.
तुमच्यासाठी काय महत्त्वाचे?
•तुमचा मोबाइल नंबर नेहमी सक्रिय ठेवा
•बँकेत आणि UPI अॅप्समध्ये अपडेटेड नंबर नोंदवलेला आहे ना, हे तपासा
•जर तुम्ही नवीन नंबर घेतला असेल, तर लगेच UPI साठी तो अपडेट करा
•न्यूमेरिक UPI ID वापरण्याआधी परवानगी द्या