शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करण्यासाठी शालेय प्रार्थनेवेळी विशेष शपथ घेतली जाणार आहे. या शपथेमध्ये, मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला जर अशा पदार्थांचा वापर होताना दिसला, तर मी त्वरित शिक्षक पालकांना कळवेन,” अशा प्रकारचा आशय असणार आहे. तसेच, प्रत्येक वर्गात दररोज दहा मिनिटे एका शिक्षकाने अमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कायदासुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रशासन विशेष पावले उचलत आहे. अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय असल्यामुळे आवश्यक त्या कायद्यात सुधारणा करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सहा उपअधिक्षकांची कृती समिती स्थापन करण्यात आली असून, आठवडाभरात हा टास्क फोर्स आपला अहवाल सादर करेल. पोलिसांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मदत केली जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

Related Posts

२०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू

राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रमाचा Pattern लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत…

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

Leave a Reply

You Missed

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!