मतदान करण्यापूर्वी आत्मचिंतन करणे गरजेचे….

मतदान हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली हक्क आहे. मात्र, अनेकदा मतदार हा हक्क वापरताना आत्मचिंतन करत नाहीत, ज्यामुळे आपल्या समाजावर, व्यवस्थेवर, आणि पुढील पिढ्यांवर होणारे परिणाम दुर्लक्षित होतात. आजच्या घडीला मतदान जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तरीही मतदानाचे प्रमाण घटतेच आहे. विशेषत: शहरी भागातील उच्चभ्रू सोसायट्यांमधील नागरिक मतदान टाळतात, ज्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत असतात, तर दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र आवश्यक मूलभूत सुविधांसाठी देखील झगडत असतात.

खरेतर, जे नागरिक खरोखरच मतदान करतात त्यांनाच पाणी, रस्ते, आरोग्य सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहावे लागते. लोकप्रतिनिधी सहज उच्चभ्रू नागरिकांच्या भेटीला जातात, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. हा फरक पाहता, खरे विश्वगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समान मतदान अधिकार जणू केवळ मत घेण्यापुरता राहिला आहे. एकदा मतदान झाल्यावर मतदाराला लोकप्रतिनिधींकडून साधी भेटदेखील मिळत नाही.

ग्रामीण किंवा शहरी भाग, दोन्हीकडेच आज अशी स्थिती आहे की, पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींची संपत्ती 10 पट वाढते, परंतु त्या भागातील नागरिकांच्या समस्यांचे मात्र काहीच निराकरण होत नाही. खराब रस्ते, दुर्लक्षित सरकारी दवाखाने, वाढलेले शैक्षणिक खर्च यामुळे सामान्य माणसाचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. कोणताही राजकीय पक्ष खरोखर सामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे दिसत नाही.

म्हणून, नागरिकांनी मतदान करताना जात, धर्म, आणि भावनांवर आधारित निर्णय न घेता राजकीय पक्षांची शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक कामगिरी विचारात घेतली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समान मतदानाचे हक्क फक्त मतदानपुरते मर्यादित ठेवू नये, तर त्यातून आपले भवितव्य निश्चित करणारे शहाणपणाने निर्णय घ्यावे.

संपादक अमोल भालेराव

  • Related Posts

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    1. एसटी दरवाढ प्रकरण:महायुती सरकारच्या एसटी दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ सरकारची नाही, तर अधिकाऱ्याच्या चुकीचा परिणाम असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते विजय…

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    भारतामध्ये रस्ते अपघात हा एक गंभीर विषय बनला आहे. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील तरुणांची संख्या चिंताजनक आहे. २०२४ मध्ये भारतात सुमारे १.८० लाख लोकांनी रस्ते अपघातांमध्ये आपला…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा