मतदान करण्यापूर्वी आत्मचिंतन करणे गरजेचे….

मतदान हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली हक्क आहे. मात्र, अनेकदा मतदार हा हक्क वापरताना आत्मचिंतन करत नाहीत, ज्यामुळे आपल्या समाजावर, व्यवस्थेवर, आणि पुढील पिढ्यांवर होणारे परिणाम दुर्लक्षित होतात. आजच्या घडीला मतदान जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तरीही मतदानाचे प्रमाण घटतेच आहे. विशेषत: शहरी भागातील उच्चभ्रू सोसायट्यांमधील नागरिक मतदान टाळतात, ज्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत असतात, तर दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र आवश्यक मूलभूत सुविधांसाठी देखील झगडत असतात.

खरेतर, जे नागरिक खरोखरच मतदान करतात त्यांनाच पाणी, रस्ते, आरोग्य सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहावे लागते. लोकप्रतिनिधी सहज उच्चभ्रू नागरिकांच्या भेटीला जातात, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. हा फरक पाहता, खरे विश्वगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समान मतदान अधिकार जणू केवळ मत घेण्यापुरता राहिला आहे. एकदा मतदान झाल्यावर मतदाराला लोकप्रतिनिधींकडून साधी भेटदेखील मिळत नाही.

ग्रामीण किंवा शहरी भाग, दोन्हीकडेच आज अशी स्थिती आहे की, पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींची संपत्ती 10 पट वाढते, परंतु त्या भागातील नागरिकांच्या समस्यांचे मात्र काहीच निराकरण होत नाही. खराब रस्ते, दुर्लक्षित सरकारी दवाखाने, वाढलेले शैक्षणिक खर्च यामुळे सामान्य माणसाचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. कोणताही राजकीय पक्ष खरोखर सामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे दिसत नाही.

म्हणून, नागरिकांनी मतदान करताना जात, धर्म, आणि भावनांवर आधारित निर्णय न घेता राजकीय पक्षांची शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक कामगिरी विचारात घेतली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समान मतदानाचे हक्क फक्त मतदानपुरते मर्यादित ठेवू नये, तर त्यातून आपले भवितव्य निश्चित करणारे शहाणपणाने निर्णय घ्यावे.

संपादक अमोल भालेराव

  • Related Posts

    मुंबई: विकासाच्या छायेत घाण आणि भ्रष्टाचाराचे वास्तव — जागृत महाराष्ट्र न्यूज, संपादक अमोल भालेराव

    भारताची आर्थिक राजधानी, मायानगरी, स्वप्नांच्या शहराला एक वेगळं स्वरूपही आहे. गगनचुंबी इमारतींनी नटलेल्या रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत, मोठमोठ्या मॉल्सच्या मागे घाणीचे ढीग आहेत, आणि प्रगतीच्या गजरामध्ये भ्रष्टाचाराचा आवाज मिसळलेला…

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    1. एसटी दरवाढ प्रकरण:महायुती सरकारच्या एसटी दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ सरकारची नाही, तर अधिकाऱ्याच्या चुकीचा परिणाम असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते विजय…

    Leave a Reply

    You Missed

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे