मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था

मुंबईतील मालाडच्या चिकूवाडी परिसरात प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवाईमुळे शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या आयुष्याची सगळी पुंजी लावून घरं खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाला आज या भ्रष्ट व्यवस्थेनं रस्त्यावर आणलं आहे. 

नागरिकांनी झा नावाच्या भू-माफियाला लाखो रुपये देऊन घरं विकत घेतली. व्यवहाराच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाचा मूक पाठिंबा होता. वीज मीटरसाठी मंजुरी देणारे हेच अधिकारी, जागेवर बांधकाम सुरू असताना गप्प बसलेले हेच अधिकारी, आज अचानक कारवाई करत आहेत. “जर ही जागा अनधिकृत होती, तर अतिक्रमण सुरू असताना प्रशासन गप्प का होतं? बांधकाम होत असताना त्यांना आंधळं आणि बहिरं काय झालं होतं?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. 



घटनास्थळी नागरिकांनी उघड आरोप केला आहे की, “प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भू-माफियांशी हातमिळवणी करून आमची लूट केली आहे. सगळं व्यवहार पूर्ण होईपर्यंत गप्प राहून आता स्वप्नं उद्ध्वस्त करण्याचा खेळ सुरू आहे.”

प्रशासनाच्या या बेकायदेशीर कारवाईने कुटुंबं अक्षरश: रस्त्यावर आली आहेत. लहान मुलं, वृद्ध आणि महिलांची दैना उडाली आहे. “आमचं आयुष्य उभं करण्यासाठी वर्षानुवर्षं घाम गाळला, आणि आज या भ्रष्ट व्यवस्थेनं आम्हाला रस्त्यावर आणलं. आता कोण न्याय देणार? कोण जबाबदार?” अशी आक्रोशपूर्ण मागणी होत आहे. 



सामान्य माणसाला भिकेला लावणाऱ्या या लुटारू व्यवस्थेला कोणाचा पाठींबा आहे? हे अधिकारी आणि भू-माफिया किती काळ सामान्य जनतेची लूटमार करत राहणार? ही लाचखोर व्यवस्था संपवण्यासाठी कोणी पुढं येणार का? की नागरिकांना असंच रस्त्यावर फेकून देण्यातच यांची महानता दिसते? 

भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कारवायांनी सामान्य माणसाच्या स्वप्नांवर केलेला हा क्रूर घाला सहन होणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता या व्यवस्थेला कोणी धडा शिकवणार की पुन्हा एकदा ही लाचखोरी निर्दोष माणसांच्या आयुष्याशी खेळणार?


पाहा जागृत, रहा जागृत
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव,मालाड मुंबई

  • Related Posts

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार