“महायुतीचं विभाजन: ‘एक हैं तो सेफ हैं’ पासून ‘वेगळ्या वाटा’ पर्यंत”

प्रत्येक निवडणुकीत मोठे आश्वासनं, गाजावाजा, आणि जनतेला भुलवण्यासाठी नवनवीन अजेंडे मांडले जातात. यावेळी महायुतीचा नारा होता— “एक हैं तो सेफ हैं”, पण 23 तारखेला निकाल लागल्यानंतर ज्या महायुतीने एकत्र येण्याचा दावा केला होता, तीच महायुती आता वेगवेगळ्या वाटांवर चालताना दिसते आहे.

निवडणूक आचारसंहिता, खर्चाची मर्यादा, आणि कायदे हे फक्त जनतेला फसवण्यासाठीच आहेत का, हा प्रश्न उभा राहतो. उमेदवारांच्या खर्च मर्यादेची मर्यादा 40 लाख रुपये असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीत पैशांचा पाऊस कसा पडतो, हे सर्वांनी पाहिले. यावर कोणती कारवाई झाली? किती जागृत नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना विचारले की, दिलेली आश्वासने पूर्ण झाली का?

ईव्हीएमवर आजही प्रश्नचिन्ह आहे. जर सरकारला स्वतःच्या कामगिरीवर एवढा विश्वास आहे, तर बॅलेट पेपरने निवडणुका का घेतल्या जात नाहीत? याचे उत्तर कुणाकडेच नाही.

महायुतीने जातीय-धार्मिक ध्रुवीकरणासाठी *”कटेंगे तो बटेंगे”* सारख्या असंविधानिक शब्दांचा वापर केला. हा आचारसंहितेचा भंग नाही का? मग कारवाई का झाली नाही? प्रचारात महागाई, बेरोजगारी, सरकारी यंत्रणांची ढासळती अवस्था यावर चर्चा केली नाही, उलट जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले गेले.

आज निकालाला आठ दिवस होत असतानाही *”एक हैं तो सेफ हैं”* म्हणणारे तीन वेगवेगळ्या दिशांना का फिरत आहेत? वक्फ बोर्डाच्या निधीवर टीका करणारे लगेच 10 कोटींची घोषणा कशी करतात

भारतीय नागरिकांनी हे समजून घ्यायला हवे की देशाची खरी ताकद संविधानावर आधारित एकतेत आहे. जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन शांती आणि एकोप्यानेच देशाची प्रगती होऊ शकते. राजकीय सत्तेसाठी होणारे खेळ व भुलथापांना बळी न पडता नेहमी जागृत राहा आणि आपल्या अधिकारांसाठी सजग व्हा.

पाहा जागृत रहा
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई

  • Related Posts

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    भारतीय लोकशाहीची जगभरात ओळख आहे – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमुळे. मात्र, हीच लोकशाही आज एक गंभीर संकटाचा सामना करत आहे. वाढती गुन्हेगारी आणि त्याचा थेट राजकारणाशी झालेला संबंध ही देशासाठी…

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    लातूर:मध्य रेल्वेच्या नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गांवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. गुजरात आणि दिल्लीसह इतर राज्यांमध्ये स्लीपर…

    Leave a Reply

    You Missed

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!