“नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

लातूर:मध्य रेल्वेच्या नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गांवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. गुजरात आणि दिल्लीसह इतर राज्यांमध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेनचे स्वप्न पूर्ण होत असताना, लातूर जिल्ह्यातील स्थिती मात्र खूपच वेगळी आहे. 

२०११ च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्या २४,५४,१९६ होती. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. उमाकांत दांगट समितीने उदगीर जिल्ह्याची शिफारस केली असून, लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, देवणी, आणि जळकोट तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि देगलूर तालुक्यांना समाविष्ट करून, मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी नावाचा नवीन तालुका तयार करण्याची योजना आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी उदगीर जिल्ह्याची घोषणा होण्याची शक्यता2 वर्तवली जात आहे.

दरम्यान, नागपूर, पुणे, मुंबईसाठी प्रस्तावित स्लीपर वंदे भारत ट्रेन गुजरातमधील अहमदाबाद ते बोरिवली हे सुमारे 500 किलोमीटरचे अंतर फक्त 5 तासांत पूर्ण करत आहे, ज्याचा वेग ताशी 120 किमीपेक्षा अधिक आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना 1350 रुपयांमध्ये जेवणासह सुविधा दिल्या जातात. मुंबई ते लातूर चालणाऱ्या काही वातानुकूलित (AC) डब्यांसह धावणाऱ्या गाड्यांपैकी, ‘लातूर – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ज्याचे तिकीट दर हे  AC 3 Tier (3A): साधारणतः ₹905
AC 2 Tier (2A): साधारणतः ₹1,265
First AC (1A): साधारणतः ₹2,100
दरम्यान आहे ही गाडी 500 किलो मिटर अंतर पूर्ण करण्यासाठी नऊ तास लावते.. लातूर जिल्ह्यातील नागरिकांना वंदे भारत ट्रेन सुविधांचा लाभ का दिला जात नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

लातूर जिल्ह्यातील २५ लाखांहून अधिक नागरिक, विशेषतः मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत. दिवाळी किंवा शाळेच्या सुट्यांमध्ये हे नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबई ते उदगीर, मुखेड इथपर्यंत खाजगी बसेसने प्रवास करतात, जिथे त्यांना दोन हजारांहून अधिक पैसे मोजावे लागतात.तर या  राज्यातील मंत्रीमंडळ, विद्यमान खाजदर शिवाजी काळगे,
माजी खाजदार सुधाकर शृंगारे आणि लातूरमधील सहा विधानसभेतील आमदार या समस्यांकडे का लक्ष देत नाहीत, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

माजी मंत्री संजय बनसोडे यांनी अशा मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, अशीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. लातूर जिल्ह्याच्या नागरिकांच्या सुविधांबाबत होणाऱ्या या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे जाणवते. 

जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव

  • Related Posts

    “तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरून भारतावर हवाई आणि तोफगोळ्यांद्वारे हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताने या हल्ल्याला केवळ यशस्वीरित्या…

    पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

    आयपीएल 2025 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 8 मे रोजी धर्मशाळेच्या मैदानावर पार पडत होता. नियोजित वेळेनुसार खेळाला सुरुवात झाली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा…

    Leave a Reply

    You Missed

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे