“महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे आणि मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश जारी करून मशिदींसह सर्व प्रार्थनास्थळांनी ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला.

मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळी भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले पाहिजेत. दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असल्यास कारवाई केली जाईल.”

भोंग्यांवर कडक कारवाईचे आदेश

  • परवानगीशिवाय कोणालाही भोंगे लावता येणार नाही.
  • ठरावीक वेळेसाठीच भोंग्यांना परवानगी दिली जाईल.
  • ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास भोंगे जप्त केले जातील.
  • नियमांचे पालन होत आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर असेल.

कायद्यात बदलाचे संकेत

वर्तमान कायद्यांनुसार पोलिसांकडे कारवाई करण्याचे मर्यादित अधिकार आहेत, कारण ही जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे. त्यामुळे नियमांमध्ये आवश्यक बदल करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ध्वनी प्रदूषणाविरोधातील ही कारवाई सर्व प्रार्थनास्थळांवर लागू असेल, असे सांगत यापुढे कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला.

Related Posts

मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने अखेर एक पाऊल मागे टाकत तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, मनसेने याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै…

महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गती आणण्यासाठी ₹57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात विशेषतः मेट्रो प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून, नागरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दिसते. मुख्यमंत्री…

Leave a Reply

You Missed

मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू