“महायुतीचं विभाजन: ‘एक हैं तो सेफ हैं’ पासून ‘वेगळ्या वाटा’ पर्यंत”

प्रत्येक निवडणुकीत मोठे आश्वासनं, गाजावाजा, आणि जनतेला भुलवण्यासाठी नवनवीन अजेंडे मांडले जातात. यावेळी महायुतीचा नारा होता— “एक हैं तो सेफ हैं”, पण 23 तारखेला निकाल लागल्यानंतर ज्या महायुतीने एकत्र येण्याचा दावा केला होता, तीच महायुती आता वेगवेगळ्या वाटांवर चालताना दिसते आहे.

निवडणूक आचारसंहिता, खर्चाची मर्यादा, आणि कायदे हे फक्त जनतेला फसवण्यासाठीच आहेत का, हा प्रश्न उभा राहतो. उमेदवारांच्या खर्च मर्यादेची मर्यादा 40 लाख रुपये असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीत पैशांचा पाऊस कसा पडतो, हे सर्वांनी पाहिले. यावर कोणती कारवाई झाली? किती जागृत नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना विचारले की, दिलेली आश्वासने पूर्ण झाली का?

ईव्हीएमवर आजही प्रश्नचिन्ह आहे. जर सरकारला स्वतःच्या कामगिरीवर एवढा विश्वास आहे, तर बॅलेट पेपरने निवडणुका का घेतल्या जात नाहीत? याचे उत्तर कुणाकडेच नाही.

महायुतीने जातीय-धार्मिक ध्रुवीकरणासाठी *”कटेंगे तो बटेंगे”* सारख्या असंविधानिक शब्दांचा वापर केला. हा आचारसंहितेचा भंग नाही का? मग कारवाई का झाली नाही? प्रचारात महागाई, बेरोजगारी, सरकारी यंत्रणांची ढासळती अवस्था यावर चर्चा केली नाही, उलट जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले गेले.

आज निकालाला आठ दिवस होत असतानाही *”एक हैं तो सेफ हैं”* म्हणणारे तीन वेगवेगळ्या दिशांना का फिरत आहेत? वक्फ बोर्डाच्या निधीवर टीका करणारे लगेच 10 कोटींची घोषणा कशी करतात

भारतीय नागरिकांनी हे समजून घ्यायला हवे की देशाची खरी ताकद संविधानावर आधारित एकतेत आहे. जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन शांती आणि एकोप्यानेच देशाची प्रगती होऊ शकते. राजकीय सत्तेसाठी होणारे खेळ व भुलथापांना बळी न पडता नेहमी जागृत राहा आणि आपल्या अधिकारांसाठी सजग व्हा.

पाहा जागृत रहा
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई

  • Related Posts

    “तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरून भारतावर हवाई आणि तोफगोळ्यांद्वारे हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताने या हल्ल्याला केवळ यशस्वीरित्या…

    पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

    आयपीएल 2025 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 8 मे रोजी धर्मशाळेच्या मैदानावर पार पडत होता. नियोजित वेळेनुसार खेळाला सुरुवात झाली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा…

    Leave a Reply

    You Missed

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे