
नाशिकच्या कामटवाडे परिसरात 17 वर्षीय करण चौरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्या डोक्यात दगड व फर्शी घालून हा हल्ला केला. पोलीस तपासात ही हत्या ‘खून का बदला खून’ म्हणून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मयत करण चौरे याच्यावर यापूर्वी गंगापूर परिसरातील अरुण बंडी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात सहभागाचा संशय होता. सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्याला जीवाचा धोका असल्याची भीती होती. सोमवारी त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यात दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे.
तपासात चिमण्या उर्फ महेश सोनवणे आणि सुमित बगाटे यांनी अरुण बंडीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी करणवर हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.