अपात्र धारावीकर कुठे जाणार? पुनर्विकासाच्या निर्णयावर पडला शिक्कामोर्तब !

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सामावले न गेलेल्या ‘अपात्र’ रहिवाशांचे पुनर्वसन आता मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर होणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी तब्बल २५६ एकर सॉल्टपॅन जमीन पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरातील ही जमीन वापरण्यात येणार आहे.

या निर्णयावर काही पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेतला असताना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.”ही संपूर्ण जमीन पूर्व द्रुतगतीमार्गाच्या पश्चिमेकडील असून, अनेक वर्षांपासून समुद्राच्या संपर्काबाहेर आहे. त्यामुळे ती विकासासाठी सुरक्षित आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

तसेच या जमिनीवर गेल्या १० वर्षांपासून मीठ उत्पादन थांबवण्यात आलं असून, सॉल्ट कमिशनर ऑफ इंडिया यांनी ती अधिकृतपणे बंद केली आहे. त्यामुळे ही जमीन आता घरबांधणीसाठी वापरणे पर्यावरणीय दृष्टीनेही योग्य आहे, असं श्रीनिवास यांनी स्पष्ट केलं.

कायदेशीर प्रक्रिया आणि पर्यावरण मंजुरीचे पालन

श्रीनिवास पुढे म्हणाले, “सर्व पर्यावरणीय आणि कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पाळण्यात येतील. ही जमीन कोणत्याही संवेदनशील पर्यावरण क्षेत्रात येत नाही. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्प अडथळ्याशिवाय राबवता येईल.”

विकास आराखड्यात मान्यता

२०१८ मध्ये मंजूर झालेल्या मुंबई विकास आराखडा २०३४ नुसार या जमिनी स्वस्त गृहप्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेच्या (शिंदे आणि ठाकरे गट) नेतृत्वात सरकार कार्यरत होते.

याआधीही २००७ मध्ये काँग्रेस सरकारने २,००० हेक्टर सॉल्टपॅन जमिनीचा वापर पुनर्वसनासाठी सुचवला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना म्हटलं,“सॉल्टपॅन जमीन न वापरता मुंबईचा पुनर्विकास शक्य नाही.”

मेट्रोसाठी सॉल्टपॅन, मग घरांसाठी का नाही?

वर्तमानात केंद्र सरकारने वडाळ्यात ५५ एकर सॉल्टपॅन जमिनीवर आपले कार्यालय आणि निवासी इमारती उभारण्यास सुरुवात केली आहे. कांजूरमार्गमधील १५ एकर जमीन मेट्रो लाईन ६ साठी वापरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही चार मेट्रो लाईन्ससाठी सॉल्टपॅन जमीन वापरण्याचा प्रस्ताव होता.

  • Related Posts

    मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-मोनोरेल ट्रायलने मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टची नवी दिशा !

    मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2B, म्हणजेच एक्वा लाईन वर 16 एप्रिल 2025 पासून ट्रायल रन सुरू होत आहे. डायमंड गार्डन (चेंबूर)…

    “बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण म्हणजेच त्यांचं खरं दर्शन”- एकनाथ शिंदे

    आज दादरच्या शिवाजी पार्क चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. या विशेष दिवशी सर्व उपस्थितांमध्ये बाबासाहेबांच्या कार्याची आठवण आणि त्यांचा आदर्श…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!