हिंदुजा फाउंडेशनचा दौंड SRPF कॅम्पसमधील उपक्रम दरवर्षी 124.85 दशलक्ष लिटर स्वच्छ पाणी वाचविणार

• SRPF कॅम्पस येथील 4,000 रहिवासी आणि 1,000 बिगर-रहिवाशांना लाभ

पुणे, 27 मार्च 2025: हिंदुजा ग्रुपची 110 वर्षे जुनी समाजाभिमुख काम करणारी शाखा हिंदुजा फाउंडेशनने आपल्या प्रमुख जल जीवन उपक्रमांतर्गत आज दौंड मधील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट 5 येथे पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प सुरू केला. हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. पॉल अब्राहम आणि SRPF चे पोलीस महानिरीक्षक श्री. अशोक मोराळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प या भागातील शाश्वत जलव्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

‘महाराष्ट्राचे धान्यभांडार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड मध्ये हिरवीगार शेती आणि भीमा-पवना नद्यांच्या सान्निध्यात असूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. अत्यधिक उष्णता, भूगर्भजल पातळीतील घट, झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि पाणीसाठ्याच्या अपुऱ्या सुविधा यामुळे अनेक भाग दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

दौंडमधील वाढती पाणीटंचाई सोडवण्यासाठी फाउंडेशनने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाच्या जोडीला SRPF गट 5 मध्ये 9 तलाव आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची अंमलबजावणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या उपक्रमाने SRPF गट 5 येथे पूर्वीपासूनच कार्यान्वित असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पावसाळी पाणी संकलन प्रकल्पाला आणखी बळकट केले आहे. हा उपक्रम सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशन (CERE) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे.

हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी या उपक्रमाचा प्रभाव ठळकपणे मांडत सांगितले, “दौंडसारख्या ठिकाणी पाणीटंचाई हा मोठा प्रश्न असून त्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. SRPF येथील हिंदुजा फाउंडेशनच्या पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पामुळे आम्ही जलसंवर्धन आणि हवामान बदल प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये योगदान देत आहोत. लाखो लिटर पावसाचे पाणी संकलित करून आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखून आम्ही हवामान अनुकूल जलव्यवस्थापन आणि शाश्वत शहरी हरित उपक्रमासाठी एक आदर्श मापदंड  निर्माण करत आहोत.”

जल जीवन उपक्रमांतर्गत SRPF गट 5 येथे 6 नवीन तलाव निर्माण करण्यात आले असून, 3 जुने तलाव खोल करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक पाणीसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. तसेच, 11 पुनर्भरण विहिरी आणि ओव्हरफ्लो चर उभारण्यात आले असून त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखले जाईल.

या कार्यक्रमाने SRPF गट 5 येथे 500 स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करत आणि  94% टिकून राहण्याचा दर साध्य करत आपला प्रभाव आणखी विस्तारला आहे. हा उपक्रम पुढील 15 वर्षांत अंदाजे 119.13 मेट्रिक टन CO₂ शोषून घेण्यास मदत करेल. त्यामुळे हवामान बदल रोखण्यात मदत होईल. 34 देशी प्रजातींचा समावेश करून, पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि स्थानिक जैवविविधतेस पाठबळ देत दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यात यश मिळाले आहे.

SRPF 5 मधील जलसंवर्धन आणि पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांच्या सर्वांगीण दृष्टीकोनामुळे दरवर्षी 124.85 दशलक्ष लिटर गोडे पाणी वाचले आहे. याचा थेट लाभ 4,000 रहिवासी आणि 1,000 कर्मचाऱ्यांना मिळत असून, 40 एकर शेती आणि 20 एकर जंगलाचे संवर्धनही होत आहे.

अलिकडेच हिंदुजा फाउंडेशनने त्यांच्या प्रमुख जल जीवन उपक्रमांतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 4,000 हून अधिक गावांमध्ये 5 दशलक्ष (50 लाख) लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात यश मिळाल्याचे जाहीर केले.

हिंदुजा फाउंडेशनने आपल्या समूह कंपन्यांसोबत मिळून देशभरातील विविध जलस्रोत पुनर्संचयित केले आहेत. त्यामध्ये देशभरातली 100 तलावांचा समावेश आहे. यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची बावडी अहमदाबादमधील मकरबा टॅंक, जोधपूरमधील नवलखा बावडी, अलवार (राजस्थान) येथील राणी मूसी सागर आणि नवी दिल्लीतील हौज शामशी या प्रकल्पांचा समावेश आहे.

  • Related Posts

    “मुंबईतल्या लँड स्कॅमचा बादशहा कोण?” आशिष शेलारांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल..

    मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असताना, शहरातील जमिनींच्या घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत आता आणखी एक प्रकरण भरलं आहे.…

    “कामाचं बोला” म्हणणाऱ्या शिंदेंना मनसे नेत्यानं दिलं प्रत्युत्तर; ट्विट करून पाठवली कामांची यादी !

    महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना, अलीकडेच एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे-ठाकरे गट युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर चिडून “कामाचं बोला!” असं उत्तर दिलं. त्यांच्या या विधानावर आता…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!