हिंदुजा फाउंडेशनचा दौंड SRPF कॅम्पसमधील उपक्रम दरवर्षी 124.85 दशलक्ष लिटर स्वच्छ पाणी वाचविणार

• SRPF कॅम्पस येथील 4,000 रहिवासी आणि 1,000 बिगर-रहिवाशांना लाभ

पुणे, 27 मार्च 2025: हिंदुजा ग्रुपची 110 वर्षे जुनी समाजाभिमुख काम करणारी शाखा हिंदुजा फाउंडेशनने आपल्या प्रमुख जल जीवन उपक्रमांतर्गत आज दौंड मधील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट 5 येथे पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प सुरू केला. हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. पॉल अब्राहम आणि SRPF चे पोलीस महानिरीक्षक श्री. अशोक मोराळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प या भागातील शाश्वत जलव्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

‘महाराष्ट्राचे धान्यभांडार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड मध्ये हिरवीगार शेती आणि भीमा-पवना नद्यांच्या सान्निध्यात असूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. अत्यधिक उष्णता, भूगर्भजल पातळीतील घट, झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि पाणीसाठ्याच्या अपुऱ्या सुविधा यामुळे अनेक भाग दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

दौंडमधील वाढती पाणीटंचाई सोडवण्यासाठी फाउंडेशनने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाच्या जोडीला SRPF गट 5 मध्ये 9 तलाव आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची अंमलबजावणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या उपक्रमाने SRPF गट 5 येथे पूर्वीपासूनच कार्यान्वित असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पावसाळी पाणी संकलन प्रकल्पाला आणखी बळकट केले आहे. हा उपक्रम सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशन (CERE) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे.

हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी या उपक्रमाचा प्रभाव ठळकपणे मांडत सांगितले, “दौंडसारख्या ठिकाणी पाणीटंचाई हा मोठा प्रश्न असून त्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. SRPF येथील हिंदुजा फाउंडेशनच्या पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पामुळे आम्ही जलसंवर्धन आणि हवामान बदल प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये योगदान देत आहोत. लाखो लिटर पावसाचे पाणी संकलित करून आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखून आम्ही हवामान अनुकूल जलव्यवस्थापन आणि शाश्वत शहरी हरित उपक्रमासाठी एक आदर्श मापदंड  निर्माण करत आहोत.”

जल जीवन उपक्रमांतर्गत SRPF गट 5 येथे 6 नवीन तलाव निर्माण करण्यात आले असून, 3 जुने तलाव खोल करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक पाणीसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. तसेच, 11 पुनर्भरण विहिरी आणि ओव्हरफ्लो चर उभारण्यात आले असून त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखले जाईल.

या कार्यक्रमाने SRPF गट 5 येथे 500 स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करत आणि  94% टिकून राहण्याचा दर साध्य करत आपला प्रभाव आणखी विस्तारला आहे. हा उपक्रम पुढील 15 वर्षांत अंदाजे 119.13 मेट्रिक टन CO₂ शोषून घेण्यास मदत करेल. त्यामुळे हवामान बदल रोखण्यात मदत होईल. 34 देशी प्रजातींचा समावेश करून, पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि स्थानिक जैवविविधतेस पाठबळ देत दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यात यश मिळाले आहे.

SRPF 5 मधील जलसंवर्धन आणि पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांच्या सर्वांगीण दृष्टीकोनामुळे दरवर्षी 124.85 दशलक्ष लिटर गोडे पाणी वाचले आहे. याचा थेट लाभ 4,000 रहिवासी आणि 1,000 कर्मचाऱ्यांना मिळत असून, 40 एकर शेती आणि 20 एकर जंगलाचे संवर्धनही होत आहे.

अलिकडेच हिंदुजा फाउंडेशनने त्यांच्या प्रमुख जल जीवन उपक्रमांतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 4,000 हून अधिक गावांमध्ये 5 दशलक्ष (50 लाख) लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात यश मिळाल्याचे जाहीर केले.

हिंदुजा फाउंडेशनने आपल्या समूह कंपन्यांसोबत मिळून देशभरातील विविध जलस्रोत पुनर्संचयित केले आहेत. त्यामध्ये देशभरातली 100 तलावांचा समावेश आहे. यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची बावडी अहमदाबादमधील मकरबा टॅंक, जोधपूरमधील नवलखा बावडी, अलवार (राजस्थान) येथील राणी मूसी सागर आणि नवी दिल्लीतील हौज शामशी या प्रकल्पांचा समावेश आहे.

  • Related Posts

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार