“महिलांना मिळावा एक खून माफ “- महिला दिनानिमित्त रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींना मागणी !

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. महिलांना एक खून माफ करण्याची संकल्पना त्यांनी मांडली असून, त्यामागील कारणही स्पष्ट केले आहे.

महिलांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा

ट्विटरवर पोस्ट करत रोहिणी खडसे म्हणाल्या,
“सर्वप्रथम, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या शांततेच्या विचारांवर चालणारा आहे. मात्र, देशातील महिला दिवसेंदिवस अधिकाधिक असुरक्षित होत आहेत. नुकतेच मुंबईमध्ये १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. महिलांवरील अत्याचार, अपहरण, घरगुती हिंसाचार वाढत असून, जागतिक सर्वेक्षणांनुसार भारत महिलांसाठी आशियातील सर्वात असुरक्षित देश आहे. त्यामुळे महिलांना स्वतःच्या सुरक्षेसाठी एक खून माफ करण्याचा अधिकार मिळावा, अशी आम्ही मागणी करतो.”

 

 

 

“आम्हाला खून करायचा आहे…”

रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या,
“आम्हाला कुणाचाही जीव घ्यायचा नाही, पण अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींचा, बलात्कारी मानसिकतेचा आणि निष्क्रिय कायदा-सुव्यवस्थेचा खून करायचा आहे. इतिहास साक्षी आहे की संकटाच्या वेळी महाराणी ताराराणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उचलली होती. मग आमच्या हक्कांसाठी आम्ही मागे का राहावे? राष्ट्रपती महोदया, आपण आमच्या या मागणीचा विचार करावा आणि महिलांना योग्य न्याय मिळावा, हीच आम्हाला जागतिक महिला दिनाची खरी भेट ठरेल.”

ही मागणी समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली असून, यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • Related Posts

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने अखेर एक पाऊल मागे टाकत तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, मनसेने याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै…

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गती आणण्यासाठी ₹57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात विशेषतः मेट्रो प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून, नागरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दिसते. मुख्यमंत्री…

    Leave a Reply

    You Missed

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू