लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? महायुती सरकारने लाडक्या बहिणीला दिला दगा..?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत २८८ पैकी तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला आहे. पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या महायुतीने यावेळी नियोजनबद्ध प्रचार व योग्य धोरणांमुळे विधानसभेत घवघवीत यश संपादन केले केले. दुसरीकडे, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळूनही ५० जागा जिंकता आल्या नाहीत.

महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजना या महिलांना आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेला दिले आहे. राजकीय विश्लेषकांनीही या योजनेला यशामागील मुख्य कारण मानले आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना दरमहा २,१०० रुपये थेट बँक खात्यात देण्याचे आश्वासन दिले होते. आता महायुती सत्तेत आल्यामुळे पात्र महिलांना या रकमेची प्रतीक्षा आहे.

मात्र, या योजनेतील हप्ता वेळेवर मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात हप्ता दिला जाईल असे जाहीर केले होते, परंतु नोव्हेंबर संपला तरी अद्याप रक्कम जमा झालेली नाही. अशातच भाजप नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार, महिलांना २,१०० रुपये मिळण्यास ७ ते १० महिने लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार वाढीव खर्चाचा विचार करत ही योजना राबवण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महिलांना प्रत्यक्ष लाभ कधी मिळेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.महिलांन मध्ये चर्चा आहे की महायुती ने फसवल..फक्त निवडणुकी साठी फसवू आश्वासन देण्यात आली.

  • Related Posts

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार