
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत २८८ पैकी तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला आहे. पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या महायुतीने यावेळी नियोजनबद्ध प्रचार व योग्य धोरणांमुळे विधानसभेत घवघवीत यश संपादन केले केले. दुसरीकडे, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळूनही ५० जागा जिंकता आल्या नाहीत.
महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजना या महिलांना आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेला दिले आहे. राजकीय विश्लेषकांनीही या योजनेला यशामागील मुख्य कारण मानले आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना दरमहा २,१०० रुपये थेट बँक खात्यात देण्याचे आश्वासन दिले होते. आता महायुती सत्तेत आल्यामुळे पात्र महिलांना या रकमेची प्रतीक्षा आहे.
मात्र, या योजनेतील हप्ता वेळेवर मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात हप्ता दिला जाईल असे जाहीर केले होते, परंतु नोव्हेंबर संपला तरी अद्याप रक्कम जमा झालेली नाही. अशातच भाजप नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार, महिलांना २,१०० रुपये मिळण्यास ७ ते १० महिने लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार वाढीव खर्चाचा विचार करत ही योजना राबवण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महिलांना प्रत्यक्ष लाभ कधी मिळेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.महिलांन मध्ये चर्चा आहे की महायुती ने फसवल..फक्त निवडणुकी साठी फसवू आश्वासन देण्यात आली.