महायुतीचं सरकार स्थापन होण्यास उशीर, मुख्यमंत्रिपदासाठी कोण होणार अंतिम नाव?

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवल्यानंतर सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. मात्र, निकाल लागल्यानंतर तब्बल आठ दिवस उलटले तरीही सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने मोठ्या राजकीय हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू

महायुतीचं नेतृत्व भाजपाच्या हातात असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाच्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांची भूमिका

एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरेगावमध्ये असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकार स्थापनेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. “मी नेहमी माझ्या गावी येत असतो. निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने महायुतीला विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील ठप्प कामं आम्ही वेगाने पुढे नेली. विकास आणि कल्याणकारी योजना आम्ही लागू केल्या, ज्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जातील,” असे शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदासाठी संभ्रम नाही

‘तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची मागणी आहे का?’ या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, “सहाजिकच जनतेच्या मनात भावना असतील. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल.”

शिवसेनेच्या मागण्या आणि चर्चेचा मुद्दा

शिवसेनेला गृह आणि महसूल खातं हवं असल्याची मागणी असल्याच्या चर्चेवर एकनाथ शिंदे म्हणाले, “सर्व गोष्टींची चर्चा सुरू आहे. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे. सत्ता हे माध्यम आहे, आमचं लक्ष्य लोकांची सेवा करणं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचं लक्ष सरकार स्थापनेवर

राज्यातील राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्रिपदाची माळ कोणाला मिळणार? यावर येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

Related Posts

मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

Leave a Reply

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार