‘युद्धाच्या पलिकडचा विचार”

लेखक: अमोल भालेराव, संपादक – जागृत महाराष्ट्र न्यूज

भारत-पाकिस्तान दरम्यान मे 2025 मध्ये झालेला तीव्र संघर्ष, ज्यामध्ये सलग 3-4 दिवस गोळीबार, ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी सीमावर्ती भाग धगधगला, हा केवळ लष्करी विजय किंवा पराभवाचा विषय नाही. या युद्धाने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे: देशाला खरोखर युद्धाची गरज आहे का? पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26-28 नागरिकांचा बळी गेला, आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर हल्ले केले. परंतु, या युद्धात खरे नुकसान किती झाले? उपलब्ध माहितीनुसार, भारतात 47-49 नागरिक आणि 5-6 सैनिक मारले गेले, तर पाकिस्तानात 31-40 नागरिक आणि 11-15 सैनिकांचा मृत्यू झाला. एकूण 94-110 मृत्यूंचा हा आकडा खूपच कमी वाटतो, जेव्हा आपण दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये झालेल्या स्फोटांचा आणि ड्रोन युद्धाच्या तीव्रतेचा विचार करतो. एका गॅस सिलिंडरच्या स्फोटात 4-5 जणांचा जीव जाणाऱ्या देशात, सततच्या लढाऊ विमानांच्या गर्जना, ड्रोन हल्ले आणि अनेक हत्यारांच्या वापराने किती जीव गेले असतील? खरा आकडा लपवला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या युद्धाने खरोखर न्याय मिळाला का? की आणखी कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली?

सरकारकडून अधिकृत मृतांचा आकडा ९४ ते ११० दरम्यान दिला जातो, पण काहीही लपवले गेले नाही का, हा संशय मनात राहतोच. दोन राष्ट्रांमधील प्रचारयंत्रणा, राष्ट्रीय भावना आणि राजकीय प्रतिष्ठा यामुळे दोन्ही देश आपले नुकसान कमी व शत्रूचे अधिक दाखवतात, हे आपण पूर्वीही पाहिले आहे. जेव्हा क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले, लढाऊ विमाने यांचा वापर सलग चार दिवस केला जातो, तेव्हा केवळ १०० मृत्यूंचा आकडा खरा वाटतो का?

प्रश्न इतकाच नाही की किती मृत्यू झाले, तर ते जीवन कुणाचे होते? ते एक जवान होते, कुणाचा मुलगा, पती, वडील होते. ते एक नागरिक होते.

आपण हक्काने विचारायला हवे – हे युद्ध खरंच देशासाठी होते का? की एका भावनिक क्षणी निर्णय घेऊन, देशाच्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार घडवला गेला?

देशात आजही:

* रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण पडलेले दिसतात.
* टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महिन्याभराची प्रतीक्षा यादी आहे.
* गावे अजूनही वीज, पाणी, आरोग्य सुविधा यांपासून वंचित आहेत.
* बेरोजगारीच्या विळख्यात तरुण घुटमळत आहेत.
* शाळा, कॉलेजमध्ये शिक्षक अपुरे आहेत.
* कुपोषणामुळे लहान मुलांचे मृत्यू होत आहेत.

या सगळ्यावर उपाय न करता जर संपूर्ण लक्ष सीमापार कारवाईकडे वळवले गेले, तर खरे नुकसान कोणाचे होईल? गरीबांचे, सामान्यांचे, सैनिकांच्या कुटुंबियांचे, आणि आपल्या देशाच्या भविष्याचे.

देशभक्ती म्हणजे केवळ शत्रूवर वार करणे नाही, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जगण्याचा हक्क सुरक्षित करणेदेखील देशभक्तीच आहे. युद्धात टाळ्या वाजवण्याऐवजी, आपण आपल्या प्रश्नांवर उत्तर मागितले पाहिजे. समाजमाध्यमांवर “देशभक्त” होण्याऐवजी “जागरूक नागरिक” होणे जास्त महत्त्वाचे आहे.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना खरी श्रद्धांजली हीच असेल – की आपण असा देश घडवू जिथे पुन्हा युद्धाची गरजच भासणार नाही.

Related Posts

मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

अलीकडच्या काळात ठाणे आणि राज्यातील इतर भागांमध्ये बेकायदेशीर बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या संदर्भातील वृत्तपत्रीय व न्यायालयीन चर्चांना वेग मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार मा. गोपाल शेट्टी…

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत…

Leave a Reply

You Missed

मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू