राज्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ – एका वर्षात ७,६३४ कोटींची फसवणूक !

राज्यात २०२४ या एकाच वर्षात सायबर चोरट्यांनी तब्बल ७,६३४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या प्रकरणांमध्ये केवळ ११ टक्के आरोपींना अटक करण्यात आली असल्याचेही समोर आले. भाजप आमदार मोहन मते आणि अन्य आमदारांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
विशेष म्हणजे, ७,६३४ कोटींपैकी ६,००० कोटी रुपयांची फसवणूक केवळ पुणे जिल्ह्यातीलच आहे. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणे कार्यरत असून, त्याठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि नांदेड येथे अत्याधुनिक सायबर गुन्हे विभाग सुरू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्प
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापे, नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नोडल सायबर पोलिस ठाण्यासह सहा प्रमुख विभाग कार्यरत असतील.
सायबर चोर विविध युक्त्या वापरून नागरिकांना फसवत आहेत. ते नकली पोलिस किंवा कस्टम अधिकारी बनून फोन करतात आणि मनी लॉंड्रिंग किंवा ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा बनाव करतात. त्यामुळे नागरिक घाबरून त्यांच्या सांगण्यावर पैसे पाठवतात. अशा फसवणुकीपासून सावध राहणे आणि संशयास्पद कॉल्सला प्रतिसाद न देणे हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी आहे.

  • Related Posts

    मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-मोनोरेल ट्रायलने मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टची नवी दिशा !

    मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2B, म्हणजेच एक्वा लाईन वर 16 एप्रिल 2025 पासून ट्रायल रन सुरू होत आहे. डायमंड गार्डन (चेंबूर)…

    “बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण म्हणजेच त्यांचं खरं दर्शन”- एकनाथ शिंदे

    आज दादरच्या शिवाजी पार्क चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. या विशेष दिवशी सर्व उपस्थितांमध्ये बाबासाहेबांच्या कार्याची आठवण आणि त्यांचा आदर्श…

    Leave a Reply

    You Missed

    ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

    ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

    ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

    ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

    दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

    ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

    ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

    ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

    ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

    ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

    ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

    भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

    भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

    महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

    महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!