जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग १

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे, जिंतूर

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सुरुवातीला  चव्हाळ बांबुंमध्ये असलेले अतिक्रमण आता लोखंडी पत्रा शेडमध्ये आल्याने या अतिक्रमणाचे रूपांतर लवकरच पक्क्या आरसीसी बांधकामात होतो की, काय? असा खोचक सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. या धैर्यशील अतिक्रमणावर कुणाचा वरद हस्त आहे. हे गुपीत मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

 

अधिक माहिती अशी की, जिंतूर तहसील कार्यालयात आजघडीला आत 22 आणि बाहेर 26अशी एकूण 46 दुकाने थाटली आहेत. याशिवाय चारचाकितून झेरॉक्स मशीन व्यवसाय करणारे चार वाहने उभी आहेत. अतिक्रमणाचे अर्धशतक होण्याला केवळ 2 दुकानाची कमतरता असल्याने दिवाळी नंतर आणखी नव्या दोन दुकानाची भर पडणार असून अतिक्रमणाचे अर्धशतक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

🔴 “तू बिनधास्त टपरी टाक, तहसीलदारांच टेंशन घेऊ नको, बाकी मी सांभाळतो”

अतिक्रमण करणारे बरेचजण कोणत्या न कोणत्या राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांचे छुपे हस्तक असल्याने राजकीय पुढाऱ्यांची बरीच बोगस कामे इथून सांभाळली जातात. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम केवळ कागदावरच राहिली आहे. या अतिक्रमण धारकांत बहुसंख्य लोक राजकीय पाठबळाने बसलेले आहेत. “साहेबांचा एक फोन विषय खल्लास ” अशी परिस्थिती आहे.

🔴 नोटीस आली की उचला उचल बाकी जैसे थे

प्राप्त माहितीनुसार सर्व अतिक्रमण धारकांना त्यांची अवैध दुकाने उचलून घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.नोटीस पालनाचा केवळ आदर म्हणून रातोरात दुकाने उचलून बाजूला ठेवली आणि आठच दिवसांत पुन्हा जैसे थे करण्यात आली. त्यामुळे तू मारल्या सारखं कर मी रडल्या सारखं करतो अशीच परिस्थिती आहे.

 

To be continue….

यांना विद्युत पुरवठा कसा होतो

बोगस कामे कशी चालतात याबद्दल आणखी काय घडामोडी आहेत हे पुढील भागात वाचा….

भाग २ वाचण्यासाठी येथे Click करा.

  • Related Posts

    सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

    सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिंतूर प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच व मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून खून…

    बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा

    सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी जिंतूर प्रतिनिधीबांगलादेशा मध्ये झालेल्या सत्तातरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक 10 डिसेंबर रोज जिंतूर शहरातून…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार