भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव: मुंबईचा जवान मुरली नाईक देशासाठी शहीद

घाटकोपरचा मुरली नाईक वीरमरण पावला; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली श्रद्धांजली

9 मे रोजी पहाटे 3 वाजता भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने बिचकून सीमारेषेवर गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य दलाने याला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानी रेंजर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, या संघर्षात देशाचे दोन वीरसैनिक शहीद झाले आहेत.

शहीद झालेल्यांमध्ये घाटकोपर, मुंबई येथील मुरली श्रीराम नाईक यांचा समावेश आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी असलेले नाईक सध्या मुंबईच्या कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. मात्र काही दिवसांपूर्वी पुनर्विकासाच्या प्रक्रियेमुळे त्यांचे घर हटवण्यात आले असून, कुटुंब सध्या आंध्र प्रदेशात राहते आहे.

मुरली नाईक यांच्या वीरमरणाची बातमी समजताच घाटकोपर परिसरात शोककळा पसरली. वार्ड क्रमांक 133 मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर्स लावण्यात आले असून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे.

या झटापटीत पूँछ सेक्टरमध्ये दुसरे जवान दिनेश शर्मा देखील पाकिस्तानशी लढताना शहीद झाले आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शहीद मुरली नाईक यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले की, “देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत.”

दरम्यान, पीडीपीच्या अध्यक्षा महबुबा मुफ्ती यांनी देखील भारत-पाकिस्तान संघर्षावर प्रतिक्रिया देताना भावूक होत म्हटलं की, “सीमावर्ती भागातील लोक दररोज संघर्ष करत आहेत. आता हे युद्ध थांबले पाहिजे. आपल्या मातांना अजून किती यातना सहन कराव्या लागणार?”

सध्या सीमेवरील तणाव कायम असून भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देत आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना संपूर्ण भारत कृतज्ञतेने नमन करत आहे.

  • Related Posts

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत…

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जागतिक पातळीवर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि योग्य माहिती पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री किरेन…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार