मेहंदीने रंगलेले हात आणि पतीच्या रक्तात माखलेला चुडा; पहलगामच्या हल्ल्यात नवविवाहितेचा आयुष्य उध्वस्त..

पहलगाम, काश्मीर – एका नवविवाहित जोडप्याच्या सहलीचं स्वप्न पाहताच क्षणात दहशतवाद्यांनी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. लग्नाला आठवडाही न झाला असताना विनय नरवाल या भारतीय नौसेनेतील लेफ्टनंटला दहशतवाद्यांनी गोळी झाडून ठार केलं. त्यांच्या पत्नीसमोरच हे भयावह दृश्य घडलं.

श्रीनगरवरून पहलगामला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. आधी या परिसराची रेकी केल्यानंतर त्यांनी थेट गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, ओडिशा व इतर राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे. अनेकजण अजूनही अडकून पडले असून काही जण सुखरूप असल्याची माहितीही समोर आली आहे.

शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांचा जीवनप्रवास

हरियाणातील करनाल येथील रहिवासी असलेले विनय नरवाल दोन वर्षांपूर्वी नौदलात भरती झाले होते. ते आणि त्यांची पत्नी नुकतेच श्रीनगरला पर्यटनासाठी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पहलगामकडे मोर्चा वळवला आणि तिथेच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली. हल्ल्यादरम्यान त्यांच्या पत्नीने केलेला अनुभव अत्यंत हृदयद्रावक आहे — “आम्ही फक्त भेलपूरी खात होतो. अचानक एक बंदूकधारी समोर आला. त्याने विचारलं, ‘तू मुसलमान आहेस का?’ नकार मिळताच त्याने गोळी झाडली.”

हल्ल्याच्या इतर भीषण कहाण्या

हैदराबाद येथील IB अधिकारी मनिष रंजन यांनाही त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. केवळ काही तासांपूर्वीच हे कुटुंब तिथे पोहोचले होते.

‘माझ्या पतीला वाचवा’ – भावनिक हाक

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वायरल झाला आहे. त्यात एक महिला आपल्या जखमी पतीला वाचवण्याची हाक देताना दिसते, पण भावनांनी भरलेल्या त्या क्षणी तिचा आवाजही थरथरत आहे. तिच्या समोरच तिचा पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो.

हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली

या अमानुष हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘द रेजिस्टन्स फ्रंट (TRF)’ ने घेतली आहे.

 

  • Related Posts

    “तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरून भारतावर हवाई आणि तोफगोळ्यांद्वारे हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताने या हल्ल्याला केवळ यशस्वीरित्या…

    पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

    आयपीएल 2025 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 8 मे रोजी धर्मशाळेच्या मैदानावर पार पडत होता. नियोजित वेळेनुसार खेळाला सुरुवात झाली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार