मालाड-मढ येथे गुड फ्रायडेला ख्रिश्चन बांधवांसाठी पाणी वाटप, शाहू फुले आंबेडकर संस्थेचा एकतेचा संदेश

मालाड: मढ येथे ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला गुड फ्रायडे हा पवित्र दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदान आणि कॅलव्हरी येथील मृत्यूचे स्मरण करणारा हा दिवस ख्रिश्चन बांधवांसाठी शोक आणि आध्यात्मिक चिंतनाचा दिवस आहे. ईस्टरच्या आधी येणाऱ्या या पवित्र शुक्रवाराला ‘गुड फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ किंवा ‘ब्लॅक फ्रायडे’ असेही संबोधले जाते, जो मानवतेच्या मुक्तीसाठी येशूच्या दुःख आणि त्यागाचे प्रतीक आहे.

या पवित्र दिनानिमित्त, शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेने मढ मार्केट येथे ख्रिश्चन बांधवांसाठी पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम आयोजित केला. गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था नेहमीच एकतेचा संदेश देत आली आहे. या उपक्रमाचे मढ बोनाव्हेंचर चर्चचे फादर संदीप बोर्जेस यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “आजच्या काळात समाजाला अशा एकतेच्या उपक्रमांची गरज आहे.”

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमोल भालेराव, संस्थापक आकाश रणधीर, सचिव अविनाश ओवळे, खजिनदार नितीन मोहिते, प्रमुख सल्लागार सचिन जाधव, उपाध्यक्ष सूरज भालेराव, उपखजिनदार देवानंद शिरसाठ, उपसचिव गजानन बनसोड, महिंद्र गौतम, मयूर मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा उपक्रम समाजात एकता आणि बंधुभाव वाढवणारा ठरला.

  • Related Posts

    महाराष्ट्र दिवस: का साजरा केला जातो?

    महाराष्ट्र दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, मुंबई प्रांताचे विभाजन…

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार? हा प्रश्न आजही चर्चेचा विषय आहे. मात्र, त्यामुळे शिवप्रेमींना आपल्या लाडक्या राजाची जयंती दोन दिवस साजरी करण्याची संधी मिळते, आणि ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार