उशीराचा शेवट: एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर पडलेली काळी छाया

मार्च-एप्रिल महिन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक, ताणतणावाने भरलेला काळ. पालक, शिक्षक, आणि संपूर्ण समाज जिथे परीक्षेला अंतिम सत्य मानतो, तिथे एका विद्यार्थ्याच्या उशिरामुळे त्याचं आयुष्यच संपलं. ही केवळ घटना नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा आरसा आहे.

मुंबईतील जुहू येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमधील नववीच्या वर्गात शिकणारा के. शक्तीवेल या विद्यार्थ्याला फक्त उशीर झाल्यामुळे परीक्षेला बसू देण्यात आलं नाही. हा विद्यार्थी आजारी होता. नेहरू नगरमधील एका साध्या, गरीब कुटुंबातून आलेला. जेव्हा तो अखेरच्या आशेने शाळेत पोहोचला, तेव्हा त्याला फक्त एकच उत्तर मिळालं – “माफ करा, तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही.” वैद्यकीय प्रमाणपत्र मागण्यात आलं, पण त्या काही मिनिटांच्या गोंधळात, तो मुलगा मानसिकदृष्ट्या कोसळला.

 

काही वेळांनी तो घरी परत गेला आणि तिथेच त्याने स्वतःचं स्वतःच्या घरी गळ फास घेऊन आत्महत्या केली. एका परीक्षा केंद्राच्या दारात थांबलेलं स्वप्न, आयुष्याला लागलेला शिक्का आणि एक पोरकी वेदना. यापेक्षा भयंकर काय असू शकतं?

शक्तीवेलच्या कुटुंबाने शाळेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना न्याय हवा आहे, पण या घटनेने आपण सर्वांनी थबकून विचार करण्याची गरज आहे. आपण मुलांना काय शिकवतोय? अभ्यासाची शिस्त की मानसिक दडपण? शाळा म्हणजे जिथे ज्ञान मिळतं, की जिथे संवेदना हरवतात?

आज शक्तीवेल नाही पण उद्या पुन्हा असं कुणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी आता शिक्षण व्यवस्थेने मनापासून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

  • Related Posts

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने अखेर एक पाऊल मागे टाकत तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, मनसेने याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै…

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई