राज्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ – एका वर्षात ७,६३४ कोटींची फसवणूक !

राज्यात २०२४ या एकाच वर्षात सायबर चोरट्यांनी तब्बल ७,६३४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या प्रकरणांमध्ये केवळ ११ टक्के आरोपींना अटक करण्यात आली असल्याचेही समोर आले. भाजप आमदार मोहन मते आणि अन्य आमदारांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
विशेष म्हणजे, ७,६३४ कोटींपैकी ६,००० कोटी रुपयांची फसवणूक केवळ पुणे जिल्ह्यातीलच आहे. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणे कार्यरत असून, त्याठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि नांदेड येथे अत्याधुनिक सायबर गुन्हे विभाग सुरू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्प
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापे, नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नोडल सायबर पोलिस ठाण्यासह सहा प्रमुख विभाग कार्यरत असतील.
सायबर चोर विविध युक्त्या वापरून नागरिकांना फसवत आहेत. ते नकली पोलिस किंवा कस्टम अधिकारी बनून फोन करतात आणि मनी लॉंड्रिंग किंवा ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा बनाव करतात. त्यामुळे नागरिक घाबरून त्यांच्या सांगण्यावर पैसे पाठवतात. अशा फसवणुकीपासून सावध राहणे आणि संशयास्पद कॉल्सला प्रतिसाद न देणे हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी आहे.

  • Related Posts

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने अखेर एक पाऊल मागे टाकत तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, मनसेने याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै…

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई