मतदान करण्यापूर्वी आत्मचिंतन करणे गरजेचे….

मतदान हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली हक्क आहे. मात्र, अनेकदा मतदार हा हक्क वापरताना आत्मचिंतन करत नाहीत, ज्यामुळे आपल्या समाजावर, व्यवस्थेवर, आणि पुढील पिढ्यांवर होणारे परिणाम दुर्लक्षित होतात. आजच्या घडीला मतदान जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तरीही मतदानाचे प्रमाण घटतेच आहे. विशेषत: शहरी भागातील उच्चभ्रू सोसायट्यांमधील नागरिक मतदान टाळतात, ज्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत असतात, तर दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र आवश्यक मूलभूत सुविधांसाठी देखील झगडत असतात.

खरेतर, जे नागरिक खरोखरच मतदान करतात त्यांनाच पाणी, रस्ते, आरोग्य सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहावे लागते. लोकप्रतिनिधी सहज उच्चभ्रू नागरिकांच्या भेटीला जातात, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. हा फरक पाहता, खरे विश्वगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समान मतदान अधिकार जणू केवळ मत घेण्यापुरता राहिला आहे. एकदा मतदान झाल्यावर मतदाराला लोकप्रतिनिधींकडून साधी भेटदेखील मिळत नाही.

ग्रामीण किंवा शहरी भाग, दोन्हीकडेच आज अशी स्थिती आहे की, पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींची संपत्ती 10 पट वाढते, परंतु त्या भागातील नागरिकांच्या समस्यांचे मात्र काहीच निराकरण होत नाही. खराब रस्ते, दुर्लक्षित सरकारी दवाखाने, वाढलेले शैक्षणिक खर्च यामुळे सामान्य माणसाचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. कोणताही राजकीय पक्ष खरोखर सामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे दिसत नाही.

म्हणून, नागरिकांनी मतदान करताना जात, धर्म, आणि भावनांवर आधारित निर्णय न घेता राजकीय पक्षांची शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक कामगिरी विचारात घेतली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समान मतदानाचे हक्क फक्त मतदानपुरते मर्यादित ठेवू नये, तर त्यातून आपले भवितव्य निश्चित करणारे शहाणपणाने निर्णय घ्यावे.

संपादक अमोल भालेराव

  • Related Posts

    मुंबई: विकासाच्या छायेत घाण आणि भ्रष्टाचाराचे वास्तव — जागृत महाराष्ट्र न्यूज, संपादक अमोल भालेराव

    भारताची आर्थिक राजधानी, मायानगरी, स्वप्नांच्या शहराला एक वेगळं स्वरूपही आहे. गगनचुंबी इमारतींनी नटलेल्या रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत, मोठमोठ्या मॉल्सच्या मागे घाणीचे ढीग आहेत, आणि प्रगतीच्या गजरामध्ये भ्रष्टाचाराचा आवाज मिसळलेला…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार