देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला!

गेल्या १२ दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले उलथापालथीचे राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, परंतु महायुतीतील नेत्यांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ लागला. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा झाली. मात्र, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम होता.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदावर सहमत
आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. “शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हावं, अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शिवसेना (शिंदे गट) आमदार उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

उदय सामंत पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचं सरकारमध्ये असणं आम्हाला गरजेचं वाटत होतं. त्यांनी संघटन प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्याचा विचार केला होता, परंतु आम्ही त्यांना विनंती केली की ते सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभवावीत. आज त्यांचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं शिवसैनिकांसाठी अभिमानास्पद आहे.”

महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद?
“महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेतील,” असंही सामंत यांनी सांगितलं.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकार अधिक स्थिर होईल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

  • Related Posts

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार