भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव: मुंबईचा जवान मुरली नाईक देशासाठी शहीद

घाटकोपरचा मुरली नाईक वीरमरण पावला; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली श्रद्धांजली

9 मे रोजी पहाटे 3 वाजता भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने बिचकून सीमारेषेवर गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य दलाने याला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानी रेंजर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, या संघर्षात देशाचे दोन वीरसैनिक शहीद झाले आहेत.

शहीद झालेल्यांमध्ये घाटकोपर, मुंबई येथील मुरली श्रीराम नाईक यांचा समावेश आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी असलेले नाईक सध्या मुंबईच्या कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. मात्र काही दिवसांपूर्वी पुनर्विकासाच्या प्रक्रियेमुळे त्यांचे घर हटवण्यात आले असून, कुटुंब सध्या आंध्र प्रदेशात राहते आहे.

मुरली नाईक यांच्या वीरमरणाची बातमी समजताच घाटकोपर परिसरात शोककळा पसरली. वार्ड क्रमांक 133 मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर्स लावण्यात आले असून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे.

या झटापटीत पूँछ सेक्टरमध्ये दुसरे जवान दिनेश शर्मा देखील पाकिस्तानशी लढताना शहीद झाले आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शहीद मुरली नाईक यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले की, “देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत.”

दरम्यान, पीडीपीच्या अध्यक्षा महबुबा मुफ्ती यांनी देखील भारत-पाकिस्तान संघर्षावर प्रतिक्रिया देताना भावूक होत म्हटलं की, “सीमावर्ती भागातील लोक दररोज संघर्ष करत आहेत. आता हे युद्ध थांबले पाहिजे. आपल्या मातांना अजून किती यातना सहन कराव्या लागणार?”

सध्या सीमेवरील तणाव कायम असून भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देत आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना संपूर्ण भारत कृतज्ञतेने नमन करत आहे.

  • Related Posts

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    नवी दिल्ली: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या: भारताची कारवाई: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत,…

    Leave a Reply

    You Missed

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे