हजपूर्वी सौदी अरेबियाचं मोठं पाऊल: पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी !

रियाध | सौदी अरेबियाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला असून भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्तसह १४ देशांच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे या देशांतील नागरिकांना उमरा (छोटा हज), व्यवसायिक दौरे आणि कौटुंबिक भेटींसाठी व्हिसा मिळणं सध्या शक्य होणार नाही.

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली असून या निर्बंधांची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली आहे आणि हे निर्बंध जून २०२५ पर्यंत लागू राहतील, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.

१३ एप्रिलपर्यंत प्रवेश मुभा

ज्यांच्याकडे याआधीच उमरा व्हिसा आहे, अशा नागरिकांना १३ एप्रिल २०२५ पर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर कोणत्याही तात्पुरत्या व्हिसावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

निर्णयामागील पार्श्वभूमी – सुरक्षा आणि व्यवस्थापन हाच उद्देश

सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, या निर्णयामागे धार्मिक यात्रेच्या सुरक्षिततेचे कारण असून, अनधिकृत आणि नोंदणी न केलेल्या यात्रेकरूंची वाढती संख्या मोठा धोका ठरू शकते.
गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान अत्यधिक उष्णतेमुळे हजारो लोकांना त्रास झाला, तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. हज यात्रेवेळी अनेकांनी योग्य नोंदणी न करता देशात प्रवेश केल्याचेही निदर्शनास आले.

यामुळे यंदाच्या हजपूर्वीच सौदी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उमरा आणि इतर तात्पुरत्या व्हिसांवर काही काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी सरकारकडून विशेष उपाययोजना

सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी याबाबत थेट निर्देश दिले असून, यंदा हज यात्रेचं व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे.
तसेच, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर, यात्रेकरूंची पूर्व-नोंदणी, तसेच सुरक्षा आणि वैद्यकीय व्यवस्थांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचे संकेत मिळाले आहेत.

कोणकोणते आहेच बंदी लागू असलेले देश ?

या निर्णयामुळे खालील १४ देशांच्या नागरिकांवर तात्पुरती व्हिसा बंदी लागू करण्यात आली आहे:

भारत

पाकिस्तान

बांग्लादेश

इजिप्त

इंडोनेशिया

इराक

नायजेरिया

जॉर्डन

अल्जेरिया

सुदान

इथिओपिया

ट्युनिशिया

येमेन

लीबिया

भारतीय मुस्लीम बांधवांमध्ये चिंता

या निर्णयामुळे भारतात अनेक मुस्लीम कुटुंबांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांनी रमजान महिन्यात उमरासाठी तयारी केली होती, तर काहींनी हजपूर्वी सौदीत जाऊन नातेवाईकांना भेटण्याचं नियोजन केलं होतं. आता हे सर्व नियोजन काही काळासाठी स्थगित करणं आवश्यक ठरणार आहे.

सौदी प्रशासनाकडून हे निर्बंध हज यात्रा संपेपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नव्याने निर्णय घेण्यात येईल, असं संकेत मिळाले आहेत. दरम्यान, सौदी अरेबियामध्ये प्रवेशासाठी नागरिकांनी फक्त अधिकृत आणि नोंदणीकृत मार्गांचा वापर करावा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

 

  • Related Posts

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३०…

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन आशियाई देशांमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीवर आता मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

    Leave a Reply

    You Missed

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू