“लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं. या गाण्यात शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र “गद्दार” असा उल्लेख होता. गाण्यातील संदर्भ एकनाथ शिंदेंना लागू होत असल्याचे सांगत शिवसैनिक आक्रमक झाले, त्यामुळे या प्रकरणावर राजकीय वादंग निर्माण झाला आहे. आता कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत आली आहे.

कुणाल कामराच्या गाण्यानंतर घडलेल्या घटना

कुणाल कामराच्या शोदरम्यान सादर केलेल्या गाण्यानंतर तो कार्यक्रम ज्या हॉटेलमध्ये झाला, त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. यानंतर कामराच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचं वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला. विधानसभेतही हा मुद्दा चर्चिला गेला. याचवेळी ठाकरे गटाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत कामराला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष निर्माण झाला.

दरम्यान, पोलिसांनी कामराला दोनदा समन्स बजावले, मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. या घडामोडीनंतर कुणाल कामराने एक नवीन पोस्ट लिहीत कलाकारांवरील दबावाबाबत भाष्य केले आहे.

काय आहे कुणाल कामराची पोस्ट?

“लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?” असे शीर्षक असलेल्या या पोस्टमध्ये तो म्हणतो:

  1. एवढा संताप व्यक्त करा की कलाकाराला जाहिराती आणि ब्रँड्स मिळणं कठीण जावं.
  2. निषेध वाढवा, जेणेकरून कलाकाराला कोणताही शो करण्याआधी अनेकदा विचार करावा लागेल.
  3. मोठ्या कार्यक्रम स्थळांवर दडपण आणा, जेणेकरून ते शो घेण्यास नकार देतील.
  4. संतापाला हिंसेचं रूप द्या, लहान स्टुडिओ आणि मंच देखील दहशतीमुळे बंद होतील.
  5. प्रेक्षकांवर समन्स काढा, म्हणजे स्टँड-अप शो हा क्राईम सीनसारखा वाटेल.

“हे काही प्लॅनिंग नाही, तर एक राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची पद्धतशीर लोकशाही हत्या करता येते,” असेही त्याने म्हटले आहे.

या प्रकरणावरून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कुणाल कामराने याआधी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती, जिथे त्याला दिलासा देण्यात आला. तसेच, या संपूर्ण वादावर माफी मागण्यास तो तयार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील त्याची पोस्ट देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • Related Posts

    मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-मोनोरेल ट्रायलने मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टची नवी दिशा !

    मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2B, म्हणजेच एक्वा लाईन वर 16 एप्रिल 2025 पासून ट्रायल रन सुरू होत आहे. डायमंड गार्डन (चेंबूर)…

    “बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण म्हणजेच त्यांचं खरं दर्शन”- एकनाथ शिंदे

    आज दादरच्या शिवाजी पार्क चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. या विशेष दिवशी सर्व उपस्थितांमध्ये बाबासाहेबांच्या कार्याची आठवण आणि त्यांचा आदर्श…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!