‘लाडकी बहीण’ योजनेतील २१०० रुपये मिळण्यासाठी महिलांना पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महिलांमध्ये प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, या योजनेतील २१०० रुपये दरमहा देण्यासंदर्भात अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट सांगितले की, “या योजनेतून महिलांना २१०० रुपये कधी मिळतील, याबाबत कुणीच ठामपणे सांगितलेले नव्हते आणि सध्या तरी हे सांगता येणार नाही. यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागू शकते.”

पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे लगेचच महिलांच्या हाती २१०० रुपये पडतील, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. ही योजना महत्त्वाकांक्षी असली, तरी त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होईल. महिलांना निश्चितच लाभ मिळेल, पण त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.”

विधिमंडळाच्या कामकाजाचा आढावा

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजाचा आढावा देखील यावेळी सविस्तर मांडला. त्या म्हणाल्या, “विधान परिषदेचे एकूण ११५ तास आणि विधानसभेचे १४६ तास कामकाज झाले. या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. अहिल्याबाई होळकर यांची जन्म त्रिशताब्दी, महिला पंचदशकपूर्ती आणि भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव यांसारख्या विषयांवर महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.”

महिलांविषयी अपशब्दांचा निषेध

डॉ. गोऱ्हे यांनी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “पूर्वी सरकार स्थापनेनंतर दोन वर्षांनी विरोधी पक्षांचे आंदोलने होत असत. मात्र, या वेळेस सुरुवातीपासूनच विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले. हे विधिमंडळाच्या परंपरेला योग्य नाही. काही जण केवळ ‘हिरोगिरी’साठी अशी वक्तव्य करतात, मात्र त्यांना कोणते शब्द वापरायचे आणि कोणते नाही, याचे भान राहिले पाहिजे. या प्रकारांविरोधात मतदारांनीही आता प्रश्न विचारायला हवेत.”

महिलांचे सक्षमीकरण हेच मुख्य ध्येय

महिलांचे सक्षमीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्या प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरतात, याचा आढावा घेण्यासाठी मी काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे.”

शिवाजीनगरचे नामकरण बदलणार

दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगरचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ करण्यास मुख्यमंत्री आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले असल्याची माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

  • Related Posts

    ‘बिझनेस ट्रिप’ ठरली शेवटची! बिहारमध्ये पुणेरी व्यावसायिकाची हत्या..

    पुण्यातील कोथरूडमधील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) यांची बिहारमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते पाटणा येथे गेले होते, मात्र तेथून पुन्हा…

    स्मार्ट पीएमपी: ‘एआय’ कॅमेर्‍यांनी वाढणार सुरक्षा, थांबणार अपघात!

    पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPLML) आपल्या प्रवासी सेवेत तांत्रिक प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि पारदर्शक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पीएमपी बसमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित स्मार्ट…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!