“मी माफी मागणार नाही!”– सोशल मिडीयावर कुणाल कामराची चार पानी प्रतिक्रिया !

कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे सादर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या घटनेनंतर मुंबईतील खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या त्याच्या शोच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. तसेच विधानसभेतही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी काहीही बोलण्याची मुभा नाही, आणि त्यावर कारवाई होईल.”

नेमकं काय घडलं?

कुणाल कामराने आपल्या कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगात्मक गाणी सादर केली. या घटनेनंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शो झालेल्या हॉटेलमध्ये तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी तोडफोड करणाऱ्यांविरोधात आणि कुणाल कामराविरोधातही गुन्हे दाखल केले आहेत.

कुणाल कामराची प्रतिक्रिया

कुणाल कामराने या संपूर्ण वादावर सोशल मिडियाद्वारे प्रतिक्रिया देत चार पानी स्टेटमेंट शेअर केली आहे. त्यात त्याने “हा शो एका अशाच प्रकारच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तोडफोड आणि गोंधळ घालणाऱ्यांनी गैरवर्तन केले. मला सांगण्यात आले की, त्यांनी लॉरीभरून टोमॅटो आणले कारण आमच्या बटर चिकनची चव त्यांना आवडली नाही,” असे त्याने मिश्किलपणे म्हटले आहे.

राजकीय प्रतिक्रियांबाबत:

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त श्रीमंतांसाठी नाही. माझ्या बोलण्यावर राजकीय लोकांचा दबाव पडणार नाही. मी कायद्याच्या विरोधात काही केलेले नाही. राजकीय सर्कशीवर मी व्यंगात्मक टीका केली आहे,” असे त्याने स्पष्ट केले.

कायदेशीर कारवाईबाबत:

“मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र, फक्त माझ्यावरच कारवाई न होता, हॉटेल फोडणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही अधिकृत नोटीसशिवाय ते हातोडे घेऊन कसे आले?” असा सवाल त्याने उपस्थित केला.

धमक्यांबाबत:

“माझा फोन नंबर लीक झाला असून, मला असंख्य धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी त्यांना व्हॉइस मेलवर फॉरवर्ड करत आहे,” असे त्याने सांगितले.

मी माफी मागणार नाही..

“मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची माफी मागणार नाही. मी घाबरणार नाही किंवा कुठेही लपणार नाही,” असे त्याने ठामपणे म्हटले आहे.

  • Related Posts

    मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-मोनोरेल ट्रायलने मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टची नवी दिशा !

    मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2B, म्हणजेच एक्वा लाईन वर 16 एप्रिल 2025 पासून ट्रायल रन सुरू होत आहे. डायमंड गार्डन (चेंबूर)…

    “बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण म्हणजेच त्यांचं खरं दर्शन”- एकनाथ शिंदे

    आज दादरच्या शिवाजी पार्क चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. या विशेष दिवशी सर्व उपस्थितांमध्ये बाबासाहेबांच्या कार्याची आठवण आणि त्यांचा आदर्श…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!