महाराष्ट्रात विडंबनाच्या नावाखाली अपमान सहन करणार नाही. – फडणवीसांचा इशारा!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून ते आपल्या शोमध्ये सादर केलं. या प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी कुणाल कामराला माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच, स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे, मात्र अपमान करण्याचा अधिकार नाही.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेने २०२४ मध्ये कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे, हे ठरवलं आहे.

त्यांच्या मते, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी विचारधारा कोण पुढे नेत आहे, हे जनता ओळखते. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणं चुकीचं आहे.”

कामराने माफी मागावी – फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल कामराने संविधानाचा संदर्भ दिल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. “संविधानाने व्यक्तिस्वातंत्र्य दिलं असलं, तरी त्याचा गैरवापर करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही,” असं ते म्हणाले. त्यामुळे “कुणाल कामराने माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली.

“योग्य ती कायदेशीर कारवाई होईल” – फडणवीस

फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की, “कोणीही स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली एखाद्या नेत्याला गद्दार म्हणू शकत नाही.” बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या लोकांवर जनतेनेच निकाल दिला आहे, असं ते म्हणाले.

“जर जाणूनबुजून कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

कुणाल कामराने केलेल्या विडंबनावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर कठोर भूमिका घेतली असून, कामराने माफी मागावी आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

  • Related Posts

    मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-मोनोरेल ट्रायलने मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टची नवी दिशा !

    मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2B, म्हणजेच एक्वा लाईन वर 16 एप्रिल 2025 पासून ट्रायल रन सुरू होत आहे. डायमंड गार्डन (चेंबूर)…

    “बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण म्हणजेच त्यांचं खरं दर्शन”- एकनाथ शिंदे

    आज दादरच्या शिवाजी पार्क चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. या विशेष दिवशी सर्व उपस्थितांमध्ये बाबासाहेबांच्या कार्याची आठवण आणि त्यांचा आदर्श…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!