शिमग्यापूर्वीच कोकण मार्गावरील रेल्वेसेवा अंशत: रद्द; प्रवाशांचे नियोजन कोलमडले !

होळी आणि जत्रांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी, सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशत: रद्द केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांची सेवा २१ मार्चपर्यंत तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

सीएसएमटीतील कामांमुळे बदल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात असून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी अलीकडेच त्याची पाहणी केली. गेल्या काही महिन्यांपासून १०, ११, १२ आणि १३ क्रमांकाच्या फलाटांचे विस्तारीकरण सुरू आहे. त्यातील १० आणि ११ क्रमांकाचे काम पूर्ण झाले असले तरी, १२ आणि १३ क्रमांकाच्या फलाटांचे काम अद्याप प्रलंबित आहे. हे पायाभूत काम २०२४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे लक्ष्य होते, मात्र विलंब झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे बदलले

तेजस, जनशताब्दीसारख्या महत्त्वाच्या गाड्या गेल्या काही महिन्यांपासून सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावत आहेत, तर मंगळुरू एक्सप्रेस ठाण्यापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. हा बदल २१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सामान घेऊन लोकल किंवा टॅक्सीचा पर्याय निवडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत गांभीर्याने विचार करावा आणि पर्यायी सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.

 

Related Posts

रोहा इंदरदेवमध्ये आगीचा तांडव: ४८ घरे जळून खाक, सुदैवाने सर्व सुखरूप !

रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीत भीषण वणवा लागल्याने तब्बल ४८ घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती