मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पहिल्या डावातील 10 वे षटक संपल्यानंतर कोहली आणि 19 वर्षीय नवोदित ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कोस्टास यांच्यात खांद्यावर टक्कर झाल्याने खेळपट्टीवर दोघांमध्ये वादावादी झाली.
ही घटना पाहणाऱ्या प्रेक्षकांना व्हिडिओत सरळ दिसत आहे की, कोहलीने विचारपूर्वक ही कृती केली. पंचांच्या हस्तक्षेपामुळे खेळ पुन्हा सुरू झाला, मात्र या वागणुकीमुळे विराट कोहलीवर टीका होत आहे. एकीकडे कोहलीला भारतात “दुसरा सचिन” म्हणून ओळखले जाते, आणि जगभरात त्याचा चाहता वर्ग मोठा आहे, त्याच कोहलीने अशा प्रकारे मैदानावर वागणे हे अनेक चाहत्यांना खटकले आहे.
सोशल मीडियावर कोहलीच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. त्याचे अनेक चाहतेही या घटनेवर कठोर प्रतिक्रिया देत आहेत. “क्रिकेट जेंटलमन्स गेम आहे; कोहलीकडून असे अपेक्षित नाही,” अशा प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.
सॅम कोस्टासने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात फलंदाजीचे कौशल्य दाखवून जगभरात प्रशंसा मिळवली आहे. त्याच्या खेळामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरुवात झाली, परंतु कोहलीसोबतच्या वादामुळे त्याच्या पदार्पणाची गोडी काहीशी कमी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोहलीच्या वागण्यावर कारवाई करत त्याला सामना शुल्काचा २०% दंड आणि एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. मात्र, या घटनेमुळे कोहलीने आपल्या प्रतिमेला धक्का दिल्याची चर्चा सर्वत्र आहे.
या वादामुळे क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंनी कसे वागावे, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेटप्रेमी कोहलीकडून शांत आणि प्रेरणादायी वागणूक अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव
२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे फलंदाज आणि गोलंदाज……
सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज: 1. कुसल मेंडिस (श्रीलंका): ४८ सामन्यांत ३७.२० च्या सरासरीने १८६० धावा, ज्यात २ शतकं आणि ११ अर्धशतकं समाविष्ट आहेत. 2. यशस्वी जयस्वाल (भारत): २३…