राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता १४ किंवा १५ डिसेंबरला

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी हा विस्तार १४ किंवा १५ डिसेंबरला होण्याची अधिक शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. तीन पक्षांमधील नेत्यांची चर्चा, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत, आणि दिल्लीकडून मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेमुळे विलंब होण्याचे संकेत आहेत.

विधिमंडळाचे नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार त्यापूर्वीच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. तथापि, शिंदे गटाचे नेते भरत गोगावले व संजय शिरसाट यांनी हा विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होईल, अशी माहिती दिली होती.

विस्तारासाठी संभाव्य तारखा

विधानसभेचे अधिवेशन ९ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याने ११ तारखेला लगेच विस्तार होणे कठीण आहे. १२ डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात व्यस्त असतील. त्यामुळे १४ डिसेंबरला मुंबईत किंवा १५ डिसेंबरला नागपुरात शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदांचे वाटप

  • भाजप: २२
  • शिंदेसेना: १२
  • अजित पवार गट: ९

विधान परिषदेच्या सदस्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही, मात्र काही अपवाद करण्यात येऊ शकतो. तसेच, काही जुन्या मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. घटक पक्षांच्या नावांबाबतही चर्चा सुरू असून, वादग्रस्त नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह आहे.

विधानसभाध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर

विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाजपकडून ॲड. राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी आणि खातेवाटपासाठी सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री व केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाकडे लागले आहे.

  • Related Posts

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार