“अजून किती दाढी पिकवायची?” – निलेश राणेंची कुडाळ मालवणमधील सभा चर्चेत

राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, सर्व राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा, रॅली आणि मेळावे जोमाने सुरू आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळणार असून, देशभराचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण जोर धरताना दिसत आहे.

याच दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी आपल्या एका विधानातून राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे. “माझ्यानंतर आलेले आमदार आणि मंत्री झाले. मग मी अजून किती दाढी पिकवायची?” असे विधान करत निलेश राणे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

निलेश राणे काय म्हणाले?

“मी ठरवलं आहे की, काहीतरी असं बनायचं की समोरच्याला वाटलं पाहिजे की, तो माझा माणूस आहे. जो माणूस एकटा उभा असतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. आता १० वर्षे गेली, अजून किती दाढी पिकवायची?” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राणे यांनी आपल्या विधानात ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांचे उदाहरण देत सांगितले की, “हे सगळे माझ्यानंतर आमदार झाले, मंत्री झाले. मला फक्त कुडाळ मालवण मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, एवढंच माझ्यासाठी पुरे आहे.”

मतदारसंघात आपले प्रेम व्यक्त

निलेश राणे म्हणाले, “तुम्ही अडीच वर्षे मला सांभाळलं. जनतेचे आभार व्यक्त करतो. आतापर्यंत दिलेली साथ भविष्यातही कायम राहावी, अशी अपेक्षा आहे.”

  • Related Posts

    झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

    महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार